शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
4
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
5
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
7
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
8
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
9
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
10
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
11
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
12
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
13
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
14
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
15
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
16
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
17
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
18
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
19
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
20
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर

कोरोना रुग्णालयाचा फेरविचार करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:38 IST

सटाणा : बागलाणमध्ये प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विलगीकरण केंद्र निर्माण करताना आणि कोरोना रुग्णालय घोषित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही.

सटाणा : बागलाणमध्ये प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विलगीकरण केंद्र निर्माण करताना आणि कोरोना रुग्णालय घोषित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही. आरोग्य यंत्रणेने आणि प्रशासनाने जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याबरोबरच कोरोना रुग्णालयाच्या बाबतीत फेरविचार करावा अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा खासदार डॉ. सुभाष भामरे व आमदार दिलीप बोरसे यांनी आढावा बैठकीत दिला.राधाई मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि.१५) खरीप हंगाम आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. भामरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग, कृषी, जलसंपदा, सहकार, महसूल आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. त्याप्रसंगी उभयतांनी इशारा दिला. देशावर कोरोनासारखे महासंकट आले आहे. याचा सामना करतांना शेती व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून खरीप हंगामाचे नियोजन करताना शेतकऱ्यांच्या बांधांवर खते आणि बियाणे कसे उपलब्ध करता येईल याचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आमदार बोरसे यांनी दिल्या. शेतीशी निगडित वस्तू खरेदी करण्यासाठी आणि त्यांची वाहतूक करण्यासाठी अडवणुकीचे धोरण न राबविता सहकार्याचे धोरण राबवावे जेणेकरून येणारे खरीप पीक शंभर टक्के आपल्या हातात येईल असेही आमदार बोरसे यांनी स्पष्ट केले. बागलाण हा ग्रीन झोनमध्ये होता मात्र प्रशासन ते टिकविण्यात कमी पडल्याचा ठपका खासदार डॉ. भामरे यांनी ठेवला. लोंढे रोखण्यात अपयश आल्यामुळेच तीन कोरोनाबाधित बागलाणमध्ये आढळले आणि ते मालेगावच्या संपर्कात आल्याचेही स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीतीही भामरे यांनी व्यक्त केली. कोरोना रुग्णालय तयार करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात ना घेतल्यामुळे प्रशासनाबद्दल जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याबाबत तत्काळ फेरविचार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या. बैठकीस नगराध्यक्ष सुनील मोरे, विजयकुमार भांगरे, जितेंद्र इंगळे पाटील, सुधाकर पवार, बांगर, हेमंत अहिरे, अभिजित रौंदळ, राजेंद्र सूर्यवंशी, महेश भडांगे, मुख्य अधिकारी हेमलता डगळे आदी उपस्थितहोते.------------------------हरणबारीमधून पाणी सोडले...बागलाण तालुक्यातील मोसम नदीकाठच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी कोलमडल्या होत्या. त्यामुळे टंचाई निर्माण झाल्याने ती दूर करण्यासाठी शुक्रवारी (दि.१५) हरणबारी धरणातून ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग मोसम नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली. हरणबारी धरणातील ६२३ दशलक्ष घनफूट या उपलब्ध पाणी साठ्यापैकी ३२० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. या आवर्तनामुळे बागलाणसह मालेगाव तालुक्यातील तब्बल ८० गावांच्या पाणीपुरवठा योजना सुरळीत होऊन पाणी संकट दूर होणार आहे. तसेच नदीकाठच्या गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक