शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
3
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
4
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
5
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
6
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
7
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
8
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
9
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
10
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
11
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
12
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
13
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
14
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
15
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
16
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
17
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
18
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
19
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
20
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )

कोरोना रुग्णालयाचा फेरविचार करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:38 IST

सटाणा : बागलाणमध्ये प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विलगीकरण केंद्र निर्माण करताना आणि कोरोना रुग्णालय घोषित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही.

सटाणा : बागलाणमध्ये प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विलगीकरण केंद्र निर्माण करताना आणि कोरोना रुग्णालय घोषित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही. आरोग्य यंत्रणेने आणि प्रशासनाने जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याबरोबरच कोरोना रुग्णालयाच्या बाबतीत फेरविचार करावा अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा खासदार डॉ. सुभाष भामरे व आमदार दिलीप बोरसे यांनी आढावा बैठकीत दिला.राधाई मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि.१५) खरीप हंगाम आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. भामरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग, कृषी, जलसंपदा, सहकार, महसूल आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. त्याप्रसंगी उभयतांनी इशारा दिला. देशावर कोरोनासारखे महासंकट आले आहे. याचा सामना करतांना शेती व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून खरीप हंगामाचे नियोजन करताना शेतकऱ्यांच्या बांधांवर खते आणि बियाणे कसे उपलब्ध करता येईल याचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आमदार बोरसे यांनी दिल्या. शेतीशी निगडित वस्तू खरेदी करण्यासाठी आणि त्यांची वाहतूक करण्यासाठी अडवणुकीचे धोरण न राबविता सहकार्याचे धोरण राबवावे जेणेकरून येणारे खरीप पीक शंभर टक्के आपल्या हातात येईल असेही आमदार बोरसे यांनी स्पष्ट केले. बागलाण हा ग्रीन झोनमध्ये होता मात्र प्रशासन ते टिकविण्यात कमी पडल्याचा ठपका खासदार डॉ. भामरे यांनी ठेवला. लोंढे रोखण्यात अपयश आल्यामुळेच तीन कोरोनाबाधित बागलाणमध्ये आढळले आणि ते मालेगावच्या संपर्कात आल्याचेही स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीतीही भामरे यांनी व्यक्त केली. कोरोना रुग्णालय तयार करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात ना घेतल्यामुळे प्रशासनाबद्दल जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याबाबत तत्काळ फेरविचार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या. बैठकीस नगराध्यक्ष सुनील मोरे, विजयकुमार भांगरे, जितेंद्र इंगळे पाटील, सुधाकर पवार, बांगर, हेमंत अहिरे, अभिजित रौंदळ, राजेंद्र सूर्यवंशी, महेश भडांगे, मुख्य अधिकारी हेमलता डगळे आदी उपस्थितहोते.------------------------हरणबारीमधून पाणी सोडले...बागलाण तालुक्यातील मोसम नदीकाठच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी कोलमडल्या होत्या. त्यामुळे टंचाई निर्माण झाल्याने ती दूर करण्यासाठी शुक्रवारी (दि.१५) हरणबारी धरणातून ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग मोसम नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली. हरणबारी धरणातील ६२३ दशलक्ष घनफूट या उपलब्ध पाणी साठ्यापैकी ३२० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. या आवर्तनामुळे बागलाणसह मालेगाव तालुक्यातील तब्बल ८० गावांच्या पाणीपुरवठा योजना सुरळीत होऊन पाणी संकट दूर होणार आहे. तसेच नदीकाठच्या गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक