शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कोरोना रुग्णालयाचा फेरविचार करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:38 IST

सटाणा : बागलाणमध्ये प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विलगीकरण केंद्र निर्माण करताना आणि कोरोना रुग्णालय घोषित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही.

सटाणा : बागलाणमध्ये प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विलगीकरण केंद्र निर्माण करताना आणि कोरोना रुग्णालय घोषित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही. आरोग्य यंत्रणेने आणि प्रशासनाने जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याबरोबरच कोरोना रुग्णालयाच्या बाबतीत फेरविचार करावा अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा खासदार डॉ. सुभाष भामरे व आमदार दिलीप बोरसे यांनी आढावा बैठकीत दिला.राधाई मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि.१५) खरीप हंगाम आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. भामरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग, कृषी, जलसंपदा, सहकार, महसूल आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. त्याप्रसंगी उभयतांनी इशारा दिला. देशावर कोरोनासारखे महासंकट आले आहे. याचा सामना करतांना शेती व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून खरीप हंगामाचे नियोजन करताना शेतकऱ्यांच्या बांधांवर खते आणि बियाणे कसे उपलब्ध करता येईल याचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आमदार बोरसे यांनी दिल्या. शेतीशी निगडित वस्तू खरेदी करण्यासाठी आणि त्यांची वाहतूक करण्यासाठी अडवणुकीचे धोरण न राबविता सहकार्याचे धोरण राबवावे जेणेकरून येणारे खरीप पीक शंभर टक्के आपल्या हातात येईल असेही आमदार बोरसे यांनी स्पष्ट केले. बागलाण हा ग्रीन झोनमध्ये होता मात्र प्रशासन ते टिकविण्यात कमी पडल्याचा ठपका खासदार डॉ. भामरे यांनी ठेवला. लोंढे रोखण्यात अपयश आल्यामुळेच तीन कोरोनाबाधित बागलाणमध्ये आढळले आणि ते मालेगावच्या संपर्कात आल्याचेही स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीतीही भामरे यांनी व्यक्त केली. कोरोना रुग्णालय तयार करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात ना घेतल्यामुळे प्रशासनाबद्दल जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याबाबत तत्काळ फेरविचार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या. बैठकीस नगराध्यक्ष सुनील मोरे, विजयकुमार भांगरे, जितेंद्र इंगळे पाटील, सुधाकर पवार, बांगर, हेमंत अहिरे, अभिजित रौंदळ, राजेंद्र सूर्यवंशी, महेश भडांगे, मुख्य अधिकारी हेमलता डगळे आदी उपस्थितहोते.------------------------हरणबारीमधून पाणी सोडले...बागलाण तालुक्यातील मोसम नदीकाठच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी कोलमडल्या होत्या. त्यामुळे टंचाई निर्माण झाल्याने ती दूर करण्यासाठी शुक्रवारी (दि.१५) हरणबारी धरणातून ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग मोसम नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली. हरणबारी धरणातील ६२३ दशलक्ष घनफूट या उपलब्ध पाणी साठ्यापैकी ३२० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. या आवर्तनामुळे बागलाणसह मालेगाव तालुक्यातील तब्बल ८० गावांच्या पाणीपुरवठा योजना सुरळीत होऊन पाणी संकट दूर होणार आहे. तसेच नदीकाठच्या गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक