शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
4
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
5
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
6
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
7
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
8
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
9
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
10
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
11
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
12
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
15
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
16
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
17
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
18
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
19
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
20
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांच्या माथी १० टक्के अडत

By admin | Updated: July 15, 2016 23:09 IST

किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांच्या माथी १० टक्के अडत

 येवला : भाजीपाला लिलाव सुरूयेवला : भाजीपाला अडत व्यापाऱ्यांनी शुक्र वारी सकाळी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांकडून कोणतीही अडत न आकारता किरकोळ खरेदीदार व्यापाऱ्यांकडून आठ टक्के अडत आकारली आणि बाजार समितीला एक टक्का शुल्क देण्याचे धोरण ठरवून शुक्रवारीपासून मार्केटमध्ये लिलाव सुरू झाले. येवला बाजार आवारात भाजीपाल्याचे लिलाव गुरुवारपासून (दि. ७) बंद होते. शुक्र वारी सकाळी तब्बल सात दिवसांनी लिलाव पुन्हा सुरू झाले आहेत. किरकोळ खरेदीदारांच्या मनात अजूनही संभ्रम अवस्था आहे. बाजार समिती नियमन मुक्तीविरोधात व्यापारी व अडतदार यांनी भाजीपाल्यासह कांदा लिलाव बंद ठेवले होते. त्यामुळे किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे भावदेखील कमालीचे वाढले आहेत. आषाढी एकादशीला बाजारात भाजीपाला कमी असल्याने बाजारभावदेखील चढे होते. बटाटे ५० रुपये किलोने विकले गेले. शेतकरी झाले व्यापारी येवला बाजार समिती भाजीपाला नियमन मुक्त करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात लिलाव बंद ठेवले असले तरी दररोज तालुक्यातील सुमारे २०० शेतकऱ्यांनी स्वत:हून भाजी मार्केटमध्ये थेट ग्राहकांना भाजीपाला विकला आहे. येवला मार्केटमध्ये आठ परवानाधारक भाजीपाला आडते आहेत, तर सुमारे २०० किरकोळ खरेदीदार व्यापारी आहेत. भाजीपाला तेजी जून आणि जुलै महिन्यात असते. इतर दहा महिने भाजीपाला मंदीच्या सावटाखालीच असतो. तेजीत शेतकरी आनंदी राहील मात्र मंदीच्या वेळी शेतकऱ्याच्या व्यथेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल काही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.(वार्ताहर)