शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

शहरात पुन्हा संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 17:37 IST

नाशिक : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात सोमवारी (दि.२०) सकाळपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेल्या हलक्या सरींच्या संततधारेने नाशिककर चिंब झाले.मागील शनिवारपासून पावसाने शहरात विश्रांती घेतली होती. शुक्रवारी शहरात दमदार हजेरी लावल्याने दिवसभरात ५.६ मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर मात्र पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. सोमवारी सकाळपासून पुन्हा ...

ठळक मुद्दे शनिवारपासून पावसाने शहरात विश्रांती घेतली होती. सोमवारी सकाळपासून पुन्हा पावसाला सुरूवात झाल्याने नाशिककरांची तारांबळ उडाली. हलक्या सरींच्या संततधारेने नाशिककर चिंब झाले.

नाशिक : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात सोमवारी (दि.२०) सकाळपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेल्या हलक्या सरींच्या संततधारेने नाशिककर चिंब झाले.मागील शनिवारपासून पावसाने शहरात विश्रांती घेतली होती. शुक्रवारी शहरात दमदार हजेरी लावल्याने दिवसभरात ५.६ मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर मात्र पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. सोमवारी सकाळपासून पुन्हा पावसाला सुरूवात झाल्याने नाशिककरांची तारांबळ उडाली. शहरात दुपारनंतर पावसाच्या सरींच्या संततधारेचा वेग वाढला होता. यामुळे रस्त्यांवरील वर्दळ प्रभावीत झाली. रस्त्यांवर फळविक्री करणाऱ्यांसह अन्य विक्रेत्यांचे हाल झाले. तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे संध्याकाळी घरी परतताना हाल झाले. वाहतुक मंदावल्याचे चित्र होते. नाशिककर दिवसभर रेनकोट परिधान करुन दैनंदिन कामे आटोपताना दिसून आले.रुसलेल्या वरुणराजाने मोठ्या विश्रांतीनंतर का होईना मागील गुरूवारपासून नाशिककरांवर पुन्हा कृपादृष्टी केली. श्रावणाच्या सहाव्या दिवशी नाशिककर मोठ्या प्रतिक्षेनंतर ओलेचिंब झाले होते. सकाळपासून ढगाळ हवामान कायम होते. सकाळी रिमझिम वर्षाव काही प्रमाणात सुरू झाला. दिवसभर शहरवासियांना सुर्यदर्शन घडू शकले नाही. नाशिककर पुन्हा रेनकोट, छत्र्या घेऊन घराबाहेर पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. दिवसभर सुरू असलेल्या हलक्या सरींमुळे शहरात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५ मि.मी. इतक्या पावसाची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. श्रावणसरींच्या वर्षावामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त झाले. धरणसाठा ९१ टक्क्यांवर पोहचला आहे. संततधार पावसामुळे शहरातील गटारी, नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने गोदापात्राची पाण्याची पातळीही वाढली आहे.काश्यपी ९६ तर गौतमी धरणाचा जलसाठा ८६ टक्क्यांवर पोहचला आहे. २४ तासांत मध्य व उत्तर महाराष्टÑात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्या शहरात मुसळधार पाऊस होण्याची चिन्हे आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक