शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खामखेडा परिसरात उन्हाळ कांद्याची पुन्हा लागवड सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 16:07 IST

खामखेडा : कधी परतीचा पाऊस तर कधी हवामानातील बदलामुळे वाया गेलेल्या लागवडीमुळे न डगमगता परिसरातील शेतकऱ्याने जिद्द कायम ठेवत उशीरा का होईना उन्हाळ कांद्याची लागवड जोमाने सुरु केल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देजिद्द कायम : अस्मानी संकटांचा मुकाबला

दरवर्षी उन्हाळ कांदा लागवडीला साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात केली जाते. परंतु चालू वर्षी शेतकऱ्यांनी दोन वेळेस उन्हाळी कांद्याचे बियाणे टाकले परंतु परतीच्या पावसामुळे सुरवातीचे बियाणे दाबली गेली. त्यानंतर महागडी बियाणे घेऊन लागवड केली परंतु पुन्हा तुरळक पाऊस व वातावरणातील बदलामुळे कांद्याच्या रोपावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने लावणीस आलेली कांद्याची रोपे वाया गेली.तरीदेखील निराश न होता शेतकऱ्यांनी पुन्हा कांद्याचे बियाणे टाकली. ती आता लागवड योग्य झाल्याने खामखेडा परिसरात सर्वत्र कांदा लागवड होताना दिसून येत आहे.यावर्षी कांद्याची उशीरा लागवड होत असल्याने कालांतराने विहिरींना पाणी कमी होण्याचा धोका लक्षात घेऊन शेतकरी आता पांरपारिक पद्धतीने शेती न करता अत्याधुनिक ठिबक सिंचन ,तुषार सिंचन ,गादी वाफा पद्धतीने कांदा लागवड करतांना दिसत आहेत. त्यामुळे पिकावर रोगाचा प्रदुर्भाव होत नाही तसेच पाणी वीज व श्रमाची बचत होते. यासाठी शेतकरी सिंचन पद्धतीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. उशीरा होणाऱ्या या लागवडीसाठी मजुरांची टंचाई असल्याने बाहेरुन मजूर आणण्याची कसरत करावी लागत आहे. तसेच वीजपुरवठ्याच्या वेळा लक्षात घेऊन लागवड करण्याची वेळ कांदा उत्पादकांवर आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती