शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

जिल्हाभरातून प्रतिसाद

By admin | Updated: September 24, 2016 23:48 IST

विविध ठिकाणांहून आलेल्या समाजबांधवांनी मोकळ्या केल्या भावना

नाशिक : कोपर्डी घटनेतील गुन्हेगारांना तत्काळ कडक शासन व्हावे, अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शनिवारी (दि. २४) नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजातर्फे भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील मराठा समाजबांधव शहरात दाखल झाले होते.या मोर्चासाठी दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील राजेश पगारे, नितीन मोरे, किरण पाचरणे, महेंद्र मोरे, सुनील पाचरणे, संदीप मोरे हे सहभागी झाले होते. अवनखेड येथून आलेल्या नागरिकांनी पंचवटी येथील मार्केट यार्ड येथे वाहने लावून या मोर्चात आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता. तसेच निफाड येथील पिंपळस येथील मराठा समाज बांधवांनी शुक्रवारपासून शहरात दाखल होण्यास सुरुवात केली होती. मागील काही दिवसांमध्ये मार्केट अनेक दिवस बंद होते. या काळात शेतकऱ्यांनी आपल्या शेतातला माल विक्रीसाठी नेला असताना मालाची विक्री होऊ शकली नाही आणि हा माल नाशवंत असल्याने अक्षरश: फेकून द्यावा लागला. मार्केट बंद काळात नुकसानभरपाई मिळण्याची घोषणा जरी सरकारने केली असली तरी मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांना पावती दाखवल्यावरच नुकसानभरपाई मिळेल, असे सांगण्यात आले, परंतु मार्केट बंद असल्याने पावत्या कशा उपलब्ध होतील, असा सवाल शेतकऱ्यांनी मांडून आपली जाहीर नाराजी यावेळी प्रगट केली. या मोर्चासाठी सवंदगाव येथील दिनकर सूर्यवंशी, धनराज सूर्यवंशी, सीताराम शेवाळे, अशोक शेवाळे, प्रकाश शेवाळे, गोविंद शेवाळे, बापू बागुल आदि शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)पिंपळस येथील रावसाहेब आहेर यांनी मराठा समाजातर्फे जाहीर करण्यात आलेल्या मागण्यांबरोबरच शेतकऱ्यांना सरकारतर्फे योग्य न्याय मिळायला हवा, अशी भावना व्यक्त केली. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात आपला तीव्र संताप व्यक्त करत शेत मालाला योग्य भाव न मिळणे, शेतकऱ्याने केलेली गुंतवणूक तसेच शेतमजुरांना देण्यात येणाऱ्या रोजगाराचीदेखील किंमत वसूल होत नाही, तसेच शेतकऱ्यांना अनुदान तुटपुंजे असल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी यावेळी केली.