शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

पाणीपुरवठा योजना हस्तांतरित करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 19:00 IST

नांदगाव व ५६ खेडी, दाभाडी व बारा गावे तसेच देवळा व दहा गावे या तीन पाणीपुरवठा योजनांकडून ११ कोटी ६४ लाख २७ हजार रुपये येणे असून, त्यामानाने वसुली फक्त २९ कोटी रुपयांचीच होऊ शकली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा निर्णय : कोट्यवधींची थकबाकी

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या जिल्ह्यातील तीन पाणीपुरवठा योजनांवर उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत असल्यामुळे या योजना संबंधित नगरपरिषदांकडे हस्तांतरित कराव्या किंवा शासनाने चालविण्यास घ्याव्यात, असा महत्त्वपूर्ण ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाणीपट्टीची वसुली न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची पहिलीच सभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेत असताना नांदगाव व ५६ खेडी, दाभाडी व बारा गावे तसेच देवळा व दहा गावे या तीन पाणीपुरवठा योजनांकडून ११ कोटी ६४ लाख २७ हजार रुपये येणे असून, त्यामानाने वसुली फक्त २९ कोटी रुपयांचीच होऊ शकली आहे. त्याचे प्रमाण फक्त २८ टक्केच असल्याची बाब लक्षात येताच उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, सभापती संजय बनकर यांनी पाणीपुरवठा अधिकारी पुरुषोत्तम ठाकूर यांना धारेवर धरले. नांदगाव ५६ गाव पाणीपुरवठा योजना जीर्ण झाली असून, त्यामुळे वसुलीत अडचणी येत असल्याचे कारण त्यांनी दिले. त्याचबरोबर या योजनेच्या नूतनीकरणासाठी शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर बनकर यांनी, वसुली व योजना जुनी झाली हे दोन्ही विषय वेगळे असून, पाणीपट्टी वसुली का केली जात नाही, अशी विचारणा केली. तर सभापती अश्विनी आहेर यांनी, या योजनेतून पंधरा दिवसांआड नांदगावकरांना पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगून नांदगाव नगरपालिकेकडून पाणीपट्टी वसुलीसाठी काय पावले उचलली, अशी विचारणा केली. डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी या योजनेसाठी ५६ गावांसाठी ६३ कर्मचारी जिल्हा परिषदेचे असून, या योजनेसाठी जिल्हा परिषद दरवर्षी सात कोटी रुपये खर्च करते, ही बाब जिल्हा परिषदेला परवडणारी नसल्याने या योजना त्या त्या नगरपालिकांकडे वा नगरपंचायतींकडे हस्तांतरित करण्यात याव्यात किंवा शासनाने त्या स्वत:कडे घेऊन चालवाव्यात, असा ठराव मांडला. या ठरावाला महेंद्रकुमार काले यांनी अनुमोदन दिले. त्याचबरोबर वसुली कर्मचाºयांना येत्या मार्च अखेरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात यावा व त्यांच्याकडून थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न केले जावेत, अन्यथा त्यांचे वेतन थांबविण्यात यावे, अशी सूचनाही करण्यात आली. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद