शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना हस्तांतरित करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 19:00 IST

नांदगाव व ५६ खेडी, दाभाडी व बारा गावे तसेच देवळा व दहा गावे या तीन पाणीपुरवठा योजनांकडून ११ कोटी ६४ लाख २७ हजार रुपये येणे असून, त्यामानाने वसुली फक्त २९ कोटी रुपयांचीच होऊ शकली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा निर्णय : कोट्यवधींची थकबाकी

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या जिल्ह्यातील तीन पाणीपुरवठा योजनांवर उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत असल्यामुळे या योजना संबंधित नगरपरिषदांकडे हस्तांतरित कराव्या किंवा शासनाने चालविण्यास घ्याव्यात, असा महत्त्वपूर्ण ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाणीपट्टीची वसुली न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची पहिलीच सभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेत असताना नांदगाव व ५६ खेडी, दाभाडी व बारा गावे तसेच देवळा व दहा गावे या तीन पाणीपुरवठा योजनांकडून ११ कोटी ६४ लाख २७ हजार रुपये येणे असून, त्यामानाने वसुली फक्त २९ कोटी रुपयांचीच होऊ शकली आहे. त्याचे प्रमाण फक्त २८ टक्केच असल्याची बाब लक्षात येताच उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, सभापती संजय बनकर यांनी पाणीपुरवठा अधिकारी पुरुषोत्तम ठाकूर यांना धारेवर धरले. नांदगाव ५६ गाव पाणीपुरवठा योजना जीर्ण झाली असून, त्यामुळे वसुलीत अडचणी येत असल्याचे कारण त्यांनी दिले. त्याचबरोबर या योजनेच्या नूतनीकरणासाठी शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर बनकर यांनी, वसुली व योजना जुनी झाली हे दोन्ही विषय वेगळे असून, पाणीपट्टी वसुली का केली जात नाही, अशी विचारणा केली. तर सभापती अश्विनी आहेर यांनी, या योजनेतून पंधरा दिवसांआड नांदगावकरांना पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगून नांदगाव नगरपालिकेकडून पाणीपट्टी वसुलीसाठी काय पावले उचलली, अशी विचारणा केली. डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी या योजनेसाठी ५६ गावांसाठी ६३ कर्मचारी जिल्हा परिषदेचे असून, या योजनेसाठी जिल्हा परिषद दरवर्षी सात कोटी रुपये खर्च करते, ही बाब जिल्हा परिषदेला परवडणारी नसल्याने या योजना त्या त्या नगरपालिकांकडे वा नगरपंचायतींकडे हस्तांतरित करण्यात याव्यात किंवा शासनाने त्या स्वत:कडे घेऊन चालवाव्यात, असा ठराव मांडला. या ठरावाला महेंद्रकुमार काले यांनी अनुमोदन दिले. त्याचबरोबर वसुली कर्मचाºयांना येत्या मार्च अखेरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात यावा व त्यांच्याकडून थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न केले जावेत, अन्यथा त्यांचे वेतन थांबविण्यात यावे, अशी सूचनाही करण्यात आली. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद