शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:45 IST

नाशिक : जिल्हयात सुरू असलेल्या पावसाने खरीप पीकांची मोठी हानी झाली असून, सोयाबीन, मका यासंह द्राक्षांचे नुकसान झाले आहे. कांदा रोप सडून गेले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त भागातील पीकांचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत करण्यात आला.

ठळक मुद्देस्थायी समिती: जिल्हा परिषद देणार आशा कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन

नाशिक : जिल्हयात सुरू असलेल्या पावसाने खरीप पीकांची मोठी हानी झाली असून, सोयाबीन, मका यासंह द्राक्षांचे नुकसान झाले आहे. कांदा रोप सडून गेले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त भागातील पीकांचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत करण्यात आला.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची मासिक आॅनलाईन सभा शुक्रवारी (दि.२५) अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीच्या सुरूवातीस डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी प्रश्न उपस्थित केला. यंदा जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. यातच गेल्या आठवडयापासून जिल्हयात पावसाने थैमान घातले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका खरीप पीकांना बसला असून, कांद्याचे रोप वाया गेले. सोयाबीन पीकात पाणी साचल्याने सडले आहे. मकाही वाया जाण्याची शक्यता आहे. यातच शासनाकडून नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याच्या भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रत्येक तालुका कृषी अधिकाºयाना दिले असल्याचे कृषी सभापती संजय बनकर यांनी सांगितले. परंतू असे असतानाही ठराविक ठिकाणीच पंचनामे केले जात असल्याची। तक्रार यावेळी करण्यात आली. नुकसानग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्यात यावी असा ठराव सभेत झाला. या चर्चेत भास्कर गावित, सविता पवार यांनी सहभाग घेतला.अतिवृष्टीचा फटका पीकांना बसलेला असतानाच ग्रामीण भागातील रस्त्यांनाही बसला आहे. रस्ते उखडले आहे. रस्ते नादुरूस्त झाले आहेत. पूराने अनेक छोटे वळण बंधारे वाहून गेले आहेत. यासाठी नुकसानग्रस्त रस्ते, बंधारे यांची पाहणी करून अहवाल सादर करावा त्यास शासनाकडून निधीची मागणी करावी असा ठराव बैठकीत झाला. बैठकीस उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, सभापती बनकर, सुरेखा दराडे, सुशिला मेंगाळ, आश्विनी आहेर, मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे आदी विभागप्रमुख उपस्थित होते.कोरोना संकटात आशा, सेविका, सेवक जीवाची बाजी लावून काम करत असताना त्यांना अगदी कमी मानधन दिले जाते. या मानधनात वाढ करण्याची मागणी सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. कोरोनाकाळात काम करणाºया आशांना दरमहा एक हजार मानधन देण्यात यावे असा ठराव सभेत झाला. या ठराव शासनाकडे पाठविण्याचे आदेश अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिले. 

 

टॅग्स :agricultureशेतीzpजिल्हा परिषद