शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:45 IST

नाशिक : जिल्हयात सुरू असलेल्या पावसाने खरीप पीकांची मोठी हानी झाली असून, सोयाबीन, मका यासंह द्राक्षांचे नुकसान झाले आहे. कांदा रोप सडून गेले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त भागातील पीकांचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत करण्यात आला.

ठळक मुद्देस्थायी समिती: जिल्हा परिषद देणार आशा कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन

नाशिक : जिल्हयात सुरू असलेल्या पावसाने खरीप पीकांची मोठी हानी झाली असून, सोयाबीन, मका यासंह द्राक्षांचे नुकसान झाले आहे. कांदा रोप सडून गेले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त भागातील पीकांचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत करण्यात आला.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची मासिक आॅनलाईन सभा शुक्रवारी (दि.२५) अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीच्या सुरूवातीस डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी प्रश्न उपस्थित केला. यंदा जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. यातच गेल्या आठवडयापासून जिल्हयात पावसाने थैमान घातले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका खरीप पीकांना बसला असून, कांद्याचे रोप वाया गेले. सोयाबीन पीकात पाणी साचल्याने सडले आहे. मकाही वाया जाण्याची शक्यता आहे. यातच शासनाकडून नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याच्या भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रत्येक तालुका कृषी अधिकाºयाना दिले असल्याचे कृषी सभापती संजय बनकर यांनी सांगितले. परंतू असे असतानाही ठराविक ठिकाणीच पंचनामे केले जात असल्याची। तक्रार यावेळी करण्यात आली. नुकसानग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्यात यावी असा ठराव सभेत झाला. या चर्चेत भास्कर गावित, सविता पवार यांनी सहभाग घेतला.अतिवृष्टीचा फटका पीकांना बसलेला असतानाच ग्रामीण भागातील रस्त्यांनाही बसला आहे. रस्ते उखडले आहे. रस्ते नादुरूस्त झाले आहेत. पूराने अनेक छोटे वळण बंधारे वाहून गेले आहेत. यासाठी नुकसानग्रस्त रस्ते, बंधारे यांची पाहणी करून अहवाल सादर करावा त्यास शासनाकडून निधीची मागणी करावी असा ठराव बैठकीत झाला. बैठकीस उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, सभापती बनकर, सुरेखा दराडे, सुशिला मेंगाळ, आश्विनी आहेर, मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे आदी विभागप्रमुख उपस्थित होते.कोरोना संकटात आशा, सेविका, सेवक जीवाची बाजी लावून काम करत असताना त्यांना अगदी कमी मानधन दिले जाते. या मानधनात वाढ करण्याची मागणी सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. कोरोनाकाळात काम करणाºया आशांना दरमहा एक हजार मानधन देण्यात यावे असा ठराव सभेत झाला. या ठराव शासनाकडे पाठविण्याचे आदेश अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिले. 

 

टॅग्स :agricultureशेतीzpजिल्हा परिषद