शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जलवाहिनीला विरोध, कळवणला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 17:26 IST

पूनंदचे पाणी पेटले : भाजपावगळता अन्य पक्षांचा सहभाग

ठळक मुद्देमुख्यमंत्री जलवाहिनीच्या भूमिपूजनाला आले तरी तालुक्यातून पाणी बाहेर जाऊ देणार नाही. वेळप्रसंगी तुरूंगात जाऊ ,असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख कारभारी आहेर यांनी दिला.

कळवण : कळवण तालुक्यातील अर्जुनसागर(पुनंद) प्रकल्पातून सटाणा नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीला तालुक्यातील भाजपा वगळता अन्य पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह शेतकरी, नागरिकांनी तीव्र विरोध करत कोल्हापूर फाट्यावर तासभर ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन केले. ठिय्या आंदोलनानंतर मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. दरम्यान शनिवारी (दि.९) सुपलेदिगर येथे अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पावर जलआंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पुनंद प्रकल्प जलवाहिनी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष व शेतकरी संघटनेचे नेते देवीदास पवार यांनी यावेळी दिली.आमदार जे.पी. गावीत,शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार,डॉ भारती पवार, मविप्रचे माजी संचालक रविंद्र देवरे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख कारभारी आहेर, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, माजी सभापती शैलेश पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, जेष्ठ नेते नारायण हिरे,अण्णा पाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष शशी पाटील, रायुकॉचे तालुका कार्याध्यक्ष संदीप वाघ, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्रकाश आहेर,उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ, माकपचे हेमंत पाटील, मोहन जाधव, छावाचे प्रदीप पगार आदी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांया नेतृत्वाखालील कोल्हापूर फाटा येथे तासभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री जलवाहिनीच्या भूमिपूजनाला आले तरी तालुक्यातून पाणी बाहेर जाऊ देणार नाही. वेळप्रसंगी तुरूंगात जाऊ ,असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख कारभारी आहेर यांनी दिला. पश्चिम वाहीन्यातील पाणी आमच्या धरणात टाका मग पाण्यावर हक्क सांगा. कळवण तालुक्यातून सत्तेचा गैरवापर करून पाणी पळवुन नेले जात असल्याचा आरोप माकपचे तालुका सरचिटणीस हेमंत पाटील यांनी केला. जलवाहिनीला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे यांनीही विरोध केला. पुनंदच्या पाण्यावर हक्क सांगण्याचा सटाणेकरांना अधिकार नसून केळझर व हरणबारी धरणातील पाण्यावर हक्क दाखवा. अन्य तालुक्यातील जनता हक्क सांगत असल्याने संघर्षाला सज्ज होण्याचे आवाहन वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटील, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्रकाश आहेर, संतोष मोरे, रायुकॉचे माजी तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, रायुकॉ तालुका कार्याध्यक्ष संदीप वाघ यांनी करु न योजनेला विरोध केला. रस्ता रोको आंदोलनात परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी