शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

जमियत उलमा-ए हिंदचे आरक्षणासाठी मालेगावी धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:24 IST

राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता मुस्लीम समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जमियत उलमा-ए-हिंदतर्फे शहरातील किदवाई रस्त्यावर शुक्रवारी लाक्षणिक धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देशुक्रवारचा मुहूर्त : प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर

आझादनगर : राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता मुस्लीम समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जमियत उलमा-ए-हिंदतर्फे शहरातील किदवाई रस्त्यावर शुक्रवारी लाक्षणिक धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी मुस्लीम समाजाचे अभ्यासक मौलाना अब्दुल हमीद अजहरी यांनी देशाच्या २० टक्के नागरिकांमध्ये शासनाप्रती अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. शासनाने मुस्लीम समाजाला तत्काळ आरक्षण देऊन मुस्लीम समाजाला न्याय द्यावा अशी मागणी केली. जमियतचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती आसिफ अंजुम नदवी, आमदार आसिफ शेख उपस्थित होते.मुस्लीम समाजाने इंग्रजांविरुद्ध प्रथम १८०३ मध्ये शाह अब्दुलअजीज यांनी प्रथम फतवा दिला. स्वदेशीचा नारा सर्वप्रथम मुस्लीम समाजाकडून दिला गेला. स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुतीही मुस्लिमांनीच मोठ्या प्रमाणावर दिली; मात्र आज याच देशात दुर्बल घटकापेक्षाही खालच्यास्तरावर जीवन जगणाºया याच समाजास सरकारकडून न्याय दिला जात नाही ही खेदजनक आहे. म्हणून सरकारने ९ सप्टेंबर २०१४ च्या परिपत्रकानुसार दिलेले आरक्षण न्यायालयाने रद्द केले होते.आमदार आसिफ शेख, सुफी गुलाम रसुल, शाकीर शेख, शफीक राणा यांची भाषणे झाली. धरणे आंदोलनात मौलाना अब्दुल हमीद जमाली, मौलाना अनिस अजहरी, आसिफ शाबान, इरफान फैजी, कारी अखलाक अहमद जमाली, अय्युब कासमी यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक, धार्मिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.उच्च न्यायालयानेच अध्यादेशावर निर्णय देताना मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण देणे योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. मात्र शासनाने आजपर्यंत आरक्षण दिलेले नाही. म्हणून राज्य सरकारने शासकीय, निमशासकीय, सेवेसह शिक्षणात आरक्षण द्यावे, विविध आयोगांच्या अभ्यासानंतर दिलेल्या अहवालानुसार व शिफारशी अन्वये राज्यात शैक्षणिक व सामाजिक मागासलेल्या समाजासाठी राज्य घटनेच्या तरतुदीनुसार विशेष मागास प्रवर्ग (अ) चे निर्माण करुन त्यात मुस्लिमांचा समावेश करावा. घटनेच्या अनुच्छेद १६ (४) मधील तरतुदीनुसार शासकीय व निमशासकीय सरळ सेवा भरतीत अस्तित्वात असलेल्या आरक्षणा व्यतिरिक्त पाच टक्के आरक्षण द्यावे आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.

टॅग्स :MalegaonमालेगांवMuslimमुस्लीम