शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

आठ हजार रेल्वे प्रवाशांनी आरक्षण केले रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 18:21 IST

गेल्या दोन आठवड्यापासून देशाच्या विविध राज्यांत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाकडून खबरदारीच्या विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचाच भाग म्हणून नागरिकांनी एका ठिकाणी घोळक्याने उभे राहू नये म्हणून जमावबंदी आदेश

ठळक मुद्देकोरोनाची भिती : ४६ लाख रूपयांचा परतावाप्रशासनाकडून काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव व शासनाकडून होत असलेल्या आवाहनानुसार नऊ दिवसांमध्ये नाशिक शहरातील तीन आरक्षण केंद्रातून सुमारे ८ हजार रेल्वे प्रवाशांनी आपले आगामी काळातील प्रवासाचे आरक्षण तिकीट रद्द केले आहे. रेल्वे प्रशासनाकडून संबंधित प्रवाशांना सुमारे ४६ लाख रुपये परत करण्यात आले असून, यामुळे रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

गेल्या दोन आठवड्यापासून देशाच्या विविध राज्यांत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाकडून खबरदारीच्या विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचाच भाग म्हणून नागरिकांनी एका ठिकाणी घोळक्याने उभे राहू नये म्हणून जमावबंदी आदेश देखील लागू करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी खूपच गरज असेल तर प्रवास करावा अन्यथा प्रवास टाळावा असे आवाहन शासन, रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या परीक्षेचा कालावधी सुरू असून सुट्टीत बहुतेक कुटबियांनी नातेवाईकांकडे अथवा बाहेरगावी फिरायला जाण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार रेल्वेचे आरक्षण तिकीट देखील निश्चित केले होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आगामी किमान दोन महिने प्रवास न करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला. गेल्या नऊ दिवसांपासून आरक्षण टिकीट रद्द करण्याची टक्केवारी दिवसेंदिवस वाढू लागली असून, यामुळे रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटू लागल्याने आर्थिकदृष्ट्या रेल्वे सुरू ठेवणे रेल्वे प्रशासनाला अवघड झाले आहे. त्यामुळे देखील रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने ज्या रेल्वे रद्द केल्या आहेत त्यांचे आरक्षण तिकीट रद्द करताना रेल्वे प्रशासनाला संबंधित प्रवाशाला आरक्षण तिकिटाचे संपूर्ण पैसे परत करावे लागत आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेNashikनाशिक