शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

रेस्क्यू : उष्माघाताने शेकडो फूट उंचीवरुन गिधाड कोसळले जमिनीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:46 IST

दिंडोरी तालुक्यातील तळेगावजवळ एका शेतात पूर्ण वाढ झालेले लांब चोचीचे गिधाड उष्माघाताने कोसळले. सुदैवाने शेतात माती असल्यामुळे गिधाड जखमी झाले नाही.

ठळक मुद्देलांब चोचीचे गिधाड उष्माघाताने कोसळले.वनविभागाशी संपर्क साधावादोन दिवस गिधाडाची देखभाल

नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात उष्मा वाढला असून, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे शेकडो फूट उंचीवरून विहार करणारा गिधाड जमिनीवर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने वेळीच प्रथमोपचार मिळाल्याने दुर्मिळ होत चाललेल्या एका गिधाडाचे प्राण वाचविण्यात वनविभाग व वन्यजीवप्रेमींना यश आले.दिंडोरी तालुक्यातील तळेगावजवळ एका शेतात पूर्ण वाढ झालेले लांब चोचीचे गिधाड उष्माघाताने कोसळले. सुदैवाने शेतात माती असल्यामुळे गिधाड जखमी झाले नाही. शेतकऱ्यांनी ही बाब वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर यांना कळविली. त्यांनी तत्काळ तेथे धाव घेतली. तत्पूर्वी शहरामधील वन्यजीवप्रेमींसाठी कार्य करणा-या इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांशी वाडेकरांनी संपर्क साधत त्यांना बोलाविले. दरम्यान, फाउंडेशनचे अभिजित महाले, राहुल कुलकर्णी, दर्शन बनकर, शिवपुष्पजा कट्यारे यांनी घटनास्थळी पोहचून डिहायड्रेशन झालेले अत्यवस्थ गिधाड ताब्यात घेत तत्काळ गिधाडाला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीचे दीड ते दोन तास साधे पाणी, ग्लुकोजमिश्रित पाणी व नारळपाणी वन्यजीवप्रेमींनी गिधाडाला दिले. त्यानंतर गिधाडाला एकांतात मानवी संपर्कापासून लांब अंधाºया खोलीत ठेवले. दोन दिवस गिधाडाची देखभाल केल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. गिधाडाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यापूर्वी भरपूर खाद्य देण्यात आले. त्यानंतर तासाभराने गिधाडाला त्र्यंबकेश्वरजवळील पेगलवाडी शिवारातील डोंगररांगेमध्ये मुक्त करण्यात आले. अवघ्या काही सेकंदात शक्तिशाली गिधाडाने आकाशात भरारी घेत आपल्या विशिष्ट आवाजाने जणू त्याची शुश्रूषा करणाºयांना धन्यवादच दिले. अवघ्या दहा मिनिटांत या गिधाडाभोवती चार ते पाच गिधाडे आकाशात जमा झाली होती आणि ते सगळे डोंगरापलीकडे निघून गेल्याची माहिती महाले यांनी दिली.

वनविभागाशी संपर्क साधावाशहराच्या कमाल तपमानात वाढ झाल्याने शहर व परिसरात कुठल्याही ठिकाणी अत्यवस्थ अवस्थेत जर कुठलाही पक्षी आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वनविभागाशी १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांनी केले आहे. वाढत्या उष्म्यामुळे पक्ष्यांना उष्माघाताचा त्रास संभवण्याचा धोका असतो.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग