शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

रेस्क्यू : उष्माघाताने शेकडो फूट उंचीवरुन गिधाड कोसळले जमिनीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:46 IST

दिंडोरी तालुक्यातील तळेगावजवळ एका शेतात पूर्ण वाढ झालेले लांब चोचीचे गिधाड उष्माघाताने कोसळले. सुदैवाने शेतात माती असल्यामुळे गिधाड जखमी झाले नाही.

ठळक मुद्देलांब चोचीचे गिधाड उष्माघाताने कोसळले.वनविभागाशी संपर्क साधावादोन दिवस गिधाडाची देखभाल

नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात उष्मा वाढला असून, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे शेकडो फूट उंचीवरून विहार करणारा गिधाड जमिनीवर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने वेळीच प्रथमोपचार मिळाल्याने दुर्मिळ होत चाललेल्या एका गिधाडाचे प्राण वाचविण्यात वनविभाग व वन्यजीवप्रेमींना यश आले.दिंडोरी तालुक्यातील तळेगावजवळ एका शेतात पूर्ण वाढ झालेले लांब चोचीचे गिधाड उष्माघाताने कोसळले. सुदैवाने शेतात माती असल्यामुळे गिधाड जखमी झाले नाही. शेतकऱ्यांनी ही बाब वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर यांना कळविली. त्यांनी तत्काळ तेथे धाव घेतली. तत्पूर्वी शहरामधील वन्यजीवप्रेमींसाठी कार्य करणा-या इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांशी वाडेकरांनी संपर्क साधत त्यांना बोलाविले. दरम्यान, फाउंडेशनचे अभिजित महाले, राहुल कुलकर्णी, दर्शन बनकर, शिवपुष्पजा कट्यारे यांनी घटनास्थळी पोहचून डिहायड्रेशन झालेले अत्यवस्थ गिधाड ताब्यात घेत तत्काळ गिधाडाला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीचे दीड ते दोन तास साधे पाणी, ग्लुकोजमिश्रित पाणी व नारळपाणी वन्यजीवप्रेमींनी गिधाडाला दिले. त्यानंतर गिधाडाला एकांतात मानवी संपर्कापासून लांब अंधाºया खोलीत ठेवले. दोन दिवस गिधाडाची देखभाल केल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. गिधाडाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यापूर्वी भरपूर खाद्य देण्यात आले. त्यानंतर तासाभराने गिधाडाला त्र्यंबकेश्वरजवळील पेगलवाडी शिवारातील डोंगररांगेमध्ये मुक्त करण्यात आले. अवघ्या काही सेकंदात शक्तिशाली गिधाडाने आकाशात भरारी घेत आपल्या विशिष्ट आवाजाने जणू त्याची शुश्रूषा करणाºयांना धन्यवादच दिले. अवघ्या दहा मिनिटांत या गिधाडाभोवती चार ते पाच गिधाडे आकाशात जमा झाली होती आणि ते सगळे डोंगरापलीकडे निघून गेल्याची माहिती महाले यांनी दिली.

वनविभागाशी संपर्क साधावाशहराच्या कमाल तपमानात वाढ झाल्याने शहर व परिसरात कुठल्याही ठिकाणी अत्यवस्थ अवस्थेत जर कुठलाही पक्षी आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वनविभागाशी १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांनी केले आहे. वाढत्या उष्म्यामुळे पक्ष्यांना उष्माघाताचा त्रास संभवण्याचा धोका असतो.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग