शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण अधिकाऱ्याच्या खुर्चीला निवेदन

By admin | Updated: September 6, 2016 22:51 IST

शेतकरी संघटनेची गांधीगिरी : खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी

 येवला : खंडित वीजपुरवठा, खराब झालेले विद्युत जनित्र, लोंबलेल्या वीजतारा, बिलवसुलीवरून विद्युत रोहित्रासाठी अडवणूक यासारख्या समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी शेतकरी संघटना नेते संतुपाटील झांबरे, शेतकऱ्यांसह वीज मंडळाच्या कार्यालयात गेले असता वीज मंडळाचे सक्षम अधिकारी कार्यालयात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उपअभियंत्याच्या खुर्चीला निवेदन चिटकविले.दरम्यान मनमाडचे कार्यकारी अभियंता शैलेश कुमार यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली हे बघून कार्यकारी अभियंता यांनी प्रतिसाद दिला आणि कार्यालयात उपस्थित असलेले येवला शहर विभागाचे अभियंता सूर्यवंशी यांना फोनवरून शेतकरी संघटनेशी चर्चा करून तीन दिवसात शेतक-यांच्या समस्या मार्गी लावण्याबाबत लेखी पत्र देण्यास सांगितले त्याप्रमाणे शेतकरी संघटनेला पत्र देण्यात आले. शेतकरी संघटनेच्या निवेदनात गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळाशी झुंज देत आहे, काहींनी आपली जीवनयात्रा संपवली. पाऊस नसल्याने कित्येक शेतकऱ्यांनी विजेच्या पंपाचे बटनसुद्धा दाबले नाही मग बिल तयार कसे झाले? असा प्रश्न उपस्थित केला.यंदा सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर मोठ्या प्रमाणावर खर्च करून रब्बीची मका, सोयाबीन, बाजरी, तूर यासारखी पिके उभी केली परंतु पीक ऐन भरात असताना पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हैराण झाला असून या पिकांना पाणी न मिळाल्यास हातचे पीक जाण्याचे संकट दिसत असल्याने पाऊस आणि काही ठिकाणी पाटामुळे विहिरीत जे पाणी आहे ते द्यायचे तर वीजमंडळाचा हा खेळ, विहिरीत पाणी दिसत असून पिकाला पाणी देते येईना, अशी परिस्थिती वीज मंडळाने तयार केली आहे.वीजपुरवठा खंडित राहणे, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलून मिळण्यासाठी वीजबिलाची सक्ती करणे, मेंटेनन्सची कामे करणे यासाठी आज शेतकरी संघटना नेते, संतुपाटील झांबरे, महिला आघाडीच्या संध्या पगारे, बाळासाहेब गायकवाड, प्रभाकर भोसले, भीमराज गायकवाड, चंद्रभान जाधव, कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड, नितीन इंगळे, पांडुरंग गायकवाड, बबन झांबरे, संतोष कदम, रायगड ग्रुपचे नारायण गायकवाड, अरविंदगिरी गोसावींसह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. तीन दिवसात वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.(वार्ताहर)