शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

अहवाल प्राप्त झाला; कारवाईचे ‘टास्क’ कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

पर्यावरण आणि विकासाचे संतुलन साधण्यासाठी स्थापन झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकांचे सत्र सुरू झाले. पहिल्याच बैठकीनंतर ...

पर्यावरण आणि विकासाचे संतुलन साधण्यासाठी स्थापन झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकांचे सत्र सुरू झाले. पहिल्याच बैठकीनंतर संतोषा व भागडी डोंगरावरील अवैध उत्खननाला ब्रेक लागल्याने जेसीबीचा खडखडाट थांबला. पुढील कारवाईसाठी वनविभागाला क्षेत्रनिश्चितीचा अहवाल तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्याने पुढील कारवाई यापेक्षा मोठी असेल असे संकेत मिळून गेले.

संतोषा व भागडी डोंगरमाथ्यावरील नऊ विकासकांनी वन हद्दीपासून सुमारे १५ मीटर अंतरावर, तर तिघा विकासकांनी वन हद्द ओलांडून १ मीटर आतपर्यंत वनजमिनीत घुसखोरी केल्याचा अहवाल वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पाठविला आहे. बेळगाव ढगा परिसरातील संतोषा - भागडी डोंगरांच्या सभोवताली असलेल्या वनसंपदेला सारूळच्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्या विकासकांकडून शासकीय नियमावलींचा भंग करत धोका निर्माण केला गेला आहे, असे वनविभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या अंतिम सर्वेक्षण अहवालात नमूद केले आहे, विशेष म्हणजे जैवविविधता व पर्यावरणाच्या ऱ्हासाला उत्खनन कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारवाईची शिफारसही अहवालात केली आहे.

उत्खननाच्या मुद्द्यावर गेल्या महिनाभरापासून लुटीपुटीच्या चर्चा आणि पाहणीचे सोपस्कर झाल्याने आता अहवाल येऊन धडकला आहे. डझनभर विकासकांना वनखात्याचा ‘रेड अलर्ट’ दिलेली बाब दुर्लक्षित करून चालणारी नाही. त्यामुळे अहवालाचे गांभीर्यदेखील अधिक आहे. प्रशासन किती तत्परतेने ॲक्शनमोडवर येणार यावर अहवालाचे गांभीर्य ठरणार आहे. एकीकडे पर्यावरणाविषयक जागरूक नाशिककर जनता, शहरातील विकासाच्या रुंदावणाऱ्या कक्षा आणि गौण खनिजातून शासनाला मिळणार महसूल अशा त्रिकोणातून जिल्हाधिकाऱ्यांना रूपरेषा आखावी लागणार आहे. खरे तर ही संपूर्ण प्रशासकीय बाब असल्याने टास्क फोर्समध्ये असलेल्या विविध समित्या आणि त्यावरील व्यक्ती, संस्था निर्णयप्रक्रियेतील भाग खरेच होऊ शकतात का, हेही यानिमित्ताने अधोरेखित होणार आहे.

- संदीप भालेराव

(जिल्हाधिकारी कार्यालयातून)