शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
3
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
4
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
5
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
6
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
7
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
9
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
10
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
11
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
12
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
13
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
14
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
16
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
17
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
18
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
19
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
20
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक

रेंढे महाराजांचा शेतात तंबू ठोकत हरिनामाचा जप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 01:16 IST

जळगाव नेऊर : विठुरायाच्या ओढीने भक्तीरसात तल्लीन होऊन पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर गाठतात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेकडो वर्षांच्या या प्रथेत खंड पडला. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा जीव कासावीस झाला. अशा स्थितीत पंढरपूरला दिंडी सोहळ्यात जाऊन येण्यासाठी जितका कालावधी लागतो तेवढ्या कालावधीत म्हणजे सुमारे दोन महिने एकाच जागेवर बसून हरिनामाचा जप करण्याचा संकल्प येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील विणेकरी एकनाथ महाराज रेंढे यांनी केला आहे.

ठळक मुद्देवारी चुकल्याची खंत : दोन महिने एकाच जागी बसून पूर्ण करणार संकल्प

जळगाव नेऊर : विठुरायाच्या ओढीने भक्तीरसात तल्लीन होऊन पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर गाठतात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेकडो वर्षांच्या या प्रथेत खंड पडला. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा जीव कासावीस झाला. अशा स्थितीत पंढरपूरला दिंडी सोहळ्यात जाऊन येण्यासाठी जितका कालावधी लागतो तेवढ्या कालावधीत म्हणजे सुमारे दोन महिने एकाच जागेवर बसून हरिनामाचा जप करण्याचा संकल्प येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील विणेकरी एकनाथ महाराज रेंढे यांनी केला आहे. सध्या ते येवला तालुक्यातील कानडी येथे नारायण महाराज काळे यांच्या शेतात तंबू ठोकून एक महिन्यापासून आपला संकल्प पूर्ण करत आहेत.दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष विठ्ठलराव शेलार, दिंडी मालक नारायण महाराज काळे, सुभाष महाराज बोराडे, वसंत महाराज शेळके, विष्णू महाराज लंके, अगस्ती महाराज, दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष शंतनू महाराज पवार, जनार्दन महाराज शेळके यांच्याकडे रेंढे यांनी एकाच जागी बसून हरिनाम जप करण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र वयाचा विचार करता असे न करण्याचा सल्ला सर्वांनी दिला, मात्र रेंढे त्यावर ठाम राहिल्याने त्यांना कानडी येथील नारायण महाराज काळे यांच्या शेतात तंबू ठोकून देण्यात आला.पिंपळगाव लेप पंचकमिटी भजनी मंडळ पिंपळगाव लेप व ग्रामस्थांनी हनुमान मंदिरात विणापूजन संतपूजन करून पिंपळगाव लेप ते कानडीपर्यंत कोरोनाच्या नियमांचे पालन करत दिंडी काढली. तंबूला भगव्या पताकांनी सजवत कानडी ग्रामस्थांनी एकनाथ महाराज रेंढे यांच्याकडे वीणा सोपवली. गेल्या एक महिन्यापासून रेंढे महाराज यांचे विणावादन अखंडपणे सुरू आहे. पालखी सोहळ्याच्या नियमाप्रमाणे तंबूत राहात हरिनामाचा जप, पहाटेची काकड आरती कानडी ग्रामस्थांच्या सहकार्याने नियमितपणे सुरू असून, येत्या १० ऑगस्टपर्यंत जप चालणार आहे.बालपणापासून म्हणजे सुमारे ४५ वर्षांपासून मी विणेकरी म्हणून दरवर्षी अखंडपणे पालखी सोहळ्यात जात असतो. दोन वर्षांपासून कोरोनामुळे पालखी सोहळ्याची परंपरा खंडित झाल्याने मी एकाच ठिकाणी बसून हरिनामाचा जप करण्याचा संकल्प केला आहे. पुढील वर्षी तरी दिंडी सोहळ्याची परंपरा सुरू होऊन विठुरायाच्या दर्शनाला जाता यावे असे मागणं परमेश्वर चरणी घातले आहे.- एकनाथ महाराज रेंढे, विणेकरी, पिंपळगाव लेप 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीSocialसामाजिक