शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

रेंढे महाराजांचा शेतात तंबू ठोकत हरिनामाचा जप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 01:16 IST

जळगाव नेऊर : विठुरायाच्या ओढीने भक्तीरसात तल्लीन होऊन पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर गाठतात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेकडो वर्षांच्या या प्रथेत खंड पडला. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा जीव कासावीस झाला. अशा स्थितीत पंढरपूरला दिंडी सोहळ्यात जाऊन येण्यासाठी जितका कालावधी लागतो तेवढ्या कालावधीत म्हणजे सुमारे दोन महिने एकाच जागेवर बसून हरिनामाचा जप करण्याचा संकल्प येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील विणेकरी एकनाथ महाराज रेंढे यांनी केला आहे.

ठळक मुद्देवारी चुकल्याची खंत : दोन महिने एकाच जागी बसून पूर्ण करणार संकल्प

जळगाव नेऊर : विठुरायाच्या ओढीने भक्तीरसात तल्लीन होऊन पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर गाठतात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेकडो वर्षांच्या या प्रथेत खंड पडला. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा जीव कासावीस झाला. अशा स्थितीत पंढरपूरला दिंडी सोहळ्यात जाऊन येण्यासाठी जितका कालावधी लागतो तेवढ्या कालावधीत म्हणजे सुमारे दोन महिने एकाच जागेवर बसून हरिनामाचा जप करण्याचा संकल्प येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील विणेकरी एकनाथ महाराज रेंढे यांनी केला आहे. सध्या ते येवला तालुक्यातील कानडी येथे नारायण महाराज काळे यांच्या शेतात तंबू ठोकून एक महिन्यापासून आपला संकल्प पूर्ण करत आहेत.दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष विठ्ठलराव शेलार, दिंडी मालक नारायण महाराज काळे, सुभाष महाराज बोराडे, वसंत महाराज शेळके, विष्णू महाराज लंके, अगस्ती महाराज, दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष शंतनू महाराज पवार, जनार्दन महाराज शेळके यांच्याकडे रेंढे यांनी एकाच जागी बसून हरिनाम जप करण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र वयाचा विचार करता असे न करण्याचा सल्ला सर्वांनी दिला, मात्र रेंढे त्यावर ठाम राहिल्याने त्यांना कानडी येथील नारायण महाराज काळे यांच्या शेतात तंबू ठोकून देण्यात आला.पिंपळगाव लेप पंचकमिटी भजनी मंडळ पिंपळगाव लेप व ग्रामस्थांनी हनुमान मंदिरात विणापूजन संतपूजन करून पिंपळगाव लेप ते कानडीपर्यंत कोरोनाच्या नियमांचे पालन करत दिंडी काढली. तंबूला भगव्या पताकांनी सजवत कानडी ग्रामस्थांनी एकनाथ महाराज रेंढे यांच्याकडे वीणा सोपवली. गेल्या एक महिन्यापासून रेंढे महाराज यांचे विणावादन अखंडपणे सुरू आहे. पालखी सोहळ्याच्या नियमाप्रमाणे तंबूत राहात हरिनामाचा जप, पहाटेची काकड आरती कानडी ग्रामस्थांच्या सहकार्याने नियमितपणे सुरू असून, येत्या १० ऑगस्टपर्यंत जप चालणार आहे.बालपणापासून म्हणजे सुमारे ४५ वर्षांपासून मी विणेकरी म्हणून दरवर्षी अखंडपणे पालखी सोहळ्यात जात असतो. दोन वर्षांपासून कोरोनामुळे पालखी सोहळ्याची परंपरा खंडित झाल्याने मी एकाच ठिकाणी बसून हरिनामाचा जप करण्याचा संकल्प केला आहे. पुढील वर्षी तरी दिंडी सोहळ्याची परंपरा सुरू होऊन विठुरायाच्या दर्शनाला जाता यावे असे मागणं परमेश्वर चरणी घातले आहे.- एकनाथ महाराज रेंढे, विणेकरी, पिंपळगाव लेप 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीSocialसामाजिक