शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

माझे नाव यादीतून काढा; तब्बल १२ हजार मतदारांचे आले अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 18:50 IST

नाशिक : निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यात मतदारयादी पुर्नरिक्षण मोहीम राबविली जात असून या विशेष मोहिमेला मतदारांकडून चांगला प्रतिसाद ...

नाशिक: निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यात मतदारयादी पुर्नरिक्षण मोहीम राबविली जात असून या विशेष मोहिमेला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवीन नावनोंदणीबरोबरच यादीतील दुबार नावे वगळण्याबाबत मतदारांकडून अर्ज भरून दिले जात आहे, तर ऑनलाईन अशा प्रकारचे अर्ज करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. ५ डिसेंबरपर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत जवळपास १२ हजार मतदारांनी यादीतील आपले दुबार नाव वगळावे, असे अर्ज भरून दिले आहेत.

जिल्ह्यातील मतदारयादी शुद्ध असावी यासाठी निरंतर प्रक्रिया राबविली जात असून, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोहीमदेखील घेतली जात आहे. या मोहिमेमध्ये मतदारांपर्यंत पोहचून त्यांना नावनोंदणी तसेच अन्य बदलांसाठी आवाहन करण्यात येत असून त्यानुसार प्रतिसाद देखील मिळत आहे. मतदारयादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणी, नावात दुरूस्ती, तसेच पत्ता बदल करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली असून, ५ डिसेंबरपर्यंत मतदारांना संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या आहेत.

फॉर्म ६ नुसार नवीन नोंदणीसाठी अर्ज : ६००७१

फॉर्म ७ नुसार वगळण्यासाठी अर्ज : १२५३२

फॉर्म ८ नुसार दुरूस्तीसाठी अर्ज : ४५१८

फॉर्म ६(अ) दुरूस्तीसाठी अर्ज : ३०६४

नवीन मतदार होण्यासाठी ६० हजार अर्ज

वयाची अठरा वर्ष पुर्ण केलेल्या नवमतदारांकडून यादीसाठी प्रतिसाद वाढत असून नाशिक जिल्ह्यातील शहरी भागातून तरुणांकडून नवीन मतदारांचे अर्ज भरून घेण्याची संख्या मोठी आहे. तालुकानिहाय आकडेवरीवरून नवमतदार पुढे आल्याचे दिसून येत आहे. नांदगाव, मालेगाव, बागलाण, चांदवह, येवला, निफाड, देवळाली या मतदारसंघातूनही नवीन मतदारांची संख्या वाढत असल्याचे दिसते.

५ जानेवारीला होणार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला असून १ नोव्हेंबर ते ५ जानेवारी २०२२ या कालावधी पर्यंत अंतिम कार्यक्रम राबविला जाणार आहे. १ नोव्हेंबर रोजी एकत्रिक प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. १ नोव्हेंबर ते ५ डिसेेबर या कालावधीत दाव व हरकती स्विकारण्यात आल्या आहेत. २० डिसेंबर पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी आहे. तर ५ जानेवारी रोजी मतदारयादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक