शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

समृद्धीसाठी आदिवासींच्या जमिनी घेण्याचा अडसर दूर कायद्यात दुरुस्ती : इगतपुरीच्या जमिनी घेता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:36 IST

नाशिक : आदिवासी क्षेत्रातील पेसा गावातील आदिवासींच्या जमिनी ग्रामसभेच्या ठरावाशिवाय घेता येणार नाही, या पूर्वीच्या कायद्यात बदल करण्यात आल्याने समृद्धी महामार्गासाठी इगतपुरीच्या १९ आदिवासी गावांतील जमिनी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकºयाने स्वत:च संमती दिल्यास यापुढे शासनाच्या प्रकल्पासाठी आता जागा घेता येणार आहे.

ठळक मुद्दे नाशिक : समृद्धी महामार्गासाठी इगतपुरीच्या १९ आदिवासी गावांतील जमिनी घेण्याचा मार्ग मोकळा जनरल व्यक्तीची जमीन घेण्यासाठी ग्रामसभेचा एकमताने ठराव केल्याशिवाय जागा घेता येणार नाही

नाशिक : आदिवासी क्षेत्रातील पेसा गावातील आदिवासींच्या जमिनी ग्रामसभेच्या ठरावाशिवाय घेता येणार नाही, या पूर्वीच्या कायद्यात बदल करण्यात आल्याने समृद्धी महामार्गासाठी इगतपुरीच्या १९ आदिवासी गावांतील जमिनी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकºयाने स्वत:च संमती दिल्यास यापुढे शासनाच्या प्रकल्पासाठी आता जागा घेता येणार आहे.मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनात इगतपुरी तालुक्यातील पेसामध्ये मोडणाºया १९ गावांतील जमीन घेण्यात मोठा अडसर निर्माण झाला होता. पेसा कायद्यान्वये आदिवासींच्या जमिनी घेण्यासाठी राज्य सरकारची अनुमती लागेल अशी त्यात तरतूद होती, तर पेसा गावातील जनरल व्यक्तीची जमीन घेण्यासाठी ग्रामसभेचा एकमताने ठराव केल्याशिवाय जागा घेता येणार नाही, असे त्यात म्हटले होते. इगतपुरी तालुक्यातील शेणीत, पिंपळगाव डुकरा, भरवीर, कवडदरा ही चार गावे वगळता अन्य गावांमध्ये पेसा कायद्याची अडचण निर्माण झाली होती, परिणामी समृद्धीसाठी इगतपुरी तालुक्यातून फक्त ६० हेक्टर जागाच थेट खरेदीने घेता आल्या आहेत. सरकारने या कायद्यात काही दुरुस्त्या केल्या असून, आता पेसामध्ये बसणाºया आदिवासींची जागा घेण्यासाठी ग्रामसभेने प्रतिकूल ठराव केल्यास पुन्हा त्याच विषयावर दुसरी ग्रामसभा घेण्यात यावी व या सभेतही जर ग्रामसभेने ठराव नामंजूर केला तर जिल्हाधिकाºयांना सदरचा ठराव विखंडित करण्याचा अधिकार आता बहाल करण्यात आला आहे, तर पेसा गावातील जनरल व्यक्तीने जागा देण्याची लेखी संमती दिल्यास जागा घेता येईल, अशी दुरुस्ती आता करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय प्रकल्पासाठी जागा घेण्यासाठी पेसा कायद्याचा यापुढे अडसर दूर झाला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनात इगतपुरी तालुक्यातील पेसामध्ये मोडणाºया १९ गावांतील जमीन घेण्यात मोठा अडसर निर्माण झाला होता. पेसा कायद्यान्वये आदिवासींच्या जमिनी घेण्यासाठी राज्य सरकारची अनुमती लागेल अशी त्यात तरतूद होती, तर पेसा गावातील जनरल व्यक्तीची जमीन घेण्यासाठी ग्रामसभेचा एकमताने ठराव केल्याशिवाय जागा घेता येणार नाही, असे त्यात म्हटले होते.