शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

समृद्धीसाठी आदिवासींच्या जमिनी घेण्याचा अडसर दूर कायद्यात दुरुस्ती : इगतपुरीच्या जमिनी घेता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:36 IST

नाशिक : आदिवासी क्षेत्रातील पेसा गावातील आदिवासींच्या जमिनी ग्रामसभेच्या ठरावाशिवाय घेता येणार नाही, या पूर्वीच्या कायद्यात बदल करण्यात आल्याने समृद्धी महामार्गासाठी इगतपुरीच्या १९ आदिवासी गावांतील जमिनी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकºयाने स्वत:च संमती दिल्यास यापुढे शासनाच्या प्रकल्पासाठी आता जागा घेता येणार आहे.

ठळक मुद्दे नाशिक : समृद्धी महामार्गासाठी इगतपुरीच्या १९ आदिवासी गावांतील जमिनी घेण्याचा मार्ग मोकळा जनरल व्यक्तीची जमीन घेण्यासाठी ग्रामसभेचा एकमताने ठराव केल्याशिवाय जागा घेता येणार नाही

नाशिक : आदिवासी क्षेत्रातील पेसा गावातील आदिवासींच्या जमिनी ग्रामसभेच्या ठरावाशिवाय घेता येणार नाही, या पूर्वीच्या कायद्यात बदल करण्यात आल्याने समृद्धी महामार्गासाठी इगतपुरीच्या १९ आदिवासी गावांतील जमिनी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकºयाने स्वत:च संमती दिल्यास यापुढे शासनाच्या प्रकल्पासाठी आता जागा घेता येणार आहे.मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनात इगतपुरी तालुक्यातील पेसामध्ये मोडणाºया १९ गावांतील जमीन घेण्यात मोठा अडसर निर्माण झाला होता. पेसा कायद्यान्वये आदिवासींच्या जमिनी घेण्यासाठी राज्य सरकारची अनुमती लागेल अशी त्यात तरतूद होती, तर पेसा गावातील जनरल व्यक्तीची जमीन घेण्यासाठी ग्रामसभेचा एकमताने ठराव केल्याशिवाय जागा घेता येणार नाही, असे त्यात म्हटले होते. इगतपुरी तालुक्यातील शेणीत, पिंपळगाव डुकरा, भरवीर, कवडदरा ही चार गावे वगळता अन्य गावांमध्ये पेसा कायद्याची अडचण निर्माण झाली होती, परिणामी समृद्धीसाठी इगतपुरी तालुक्यातून फक्त ६० हेक्टर जागाच थेट खरेदीने घेता आल्या आहेत. सरकारने या कायद्यात काही दुरुस्त्या केल्या असून, आता पेसामध्ये बसणाºया आदिवासींची जागा घेण्यासाठी ग्रामसभेने प्रतिकूल ठराव केल्यास पुन्हा त्याच विषयावर दुसरी ग्रामसभा घेण्यात यावी व या सभेतही जर ग्रामसभेने ठराव नामंजूर केला तर जिल्हाधिकाºयांना सदरचा ठराव विखंडित करण्याचा अधिकार आता बहाल करण्यात आला आहे, तर पेसा गावातील जनरल व्यक्तीने जागा देण्याची लेखी संमती दिल्यास जागा घेता येईल, अशी दुरुस्ती आता करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय प्रकल्पासाठी जागा घेण्यासाठी पेसा कायद्याचा यापुढे अडसर दूर झाला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनात इगतपुरी तालुक्यातील पेसामध्ये मोडणाºया १९ गावांतील जमीन घेण्यात मोठा अडसर निर्माण झाला होता. पेसा कायद्यान्वये आदिवासींच्या जमिनी घेण्यासाठी राज्य सरकारची अनुमती लागेल अशी त्यात तरतूद होती, तर पेसा गावातील जनरल व्यक्तीची जमीन घेण्यासाठी ग्रामसभेचा एकमताने ठराव केल्याशिवाय जागा घेता येणार नाही, असे त्यात म्हटले होते.