शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

जीवनात धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे :  मुनीराज हंसबोधी विजयजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:05 IST

मानवी जीवन फार मोठ्या पुण्याईने मिळाले असून, त्याचे सार्थक करावयाचे असेल तर जैन धर्माशिवाय पर्याय नाही, सध्याचे जीवन युवा अवस्था अत्यंत भयानक असून, टीव्ही, मोबाइल, व्हाट्स अ‍ॅप यांसारख्या वस्तुंमुळे जीवन निरर्थक बनले आहे.

नाशिक : मानवी जीवन फार मोठ्या पुण्याईने मिळाले असून, त्याचे सार्थक करावयाचे असेल तर जैन धर्माशिवाय पर्याय नाही, सध्याचे जीवन युवा अवस्था अत्यंत भयानक असून, टीव्ही, मोबाइल, व्हाट्स अ‍ॅप यांसारख्या वस्तुंमुळे जीवन निरर्थक बनले आहे. भगवान महावीर यांनी दिलेल्या सत्य, अहिंसा आदी जीवन मूल्यांचा अंगीकार आपण केलाच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन जैन मुनीराज हंसबोधी विजयजी म.सा. यांनी केले आहे.  रोटरी हॉल येथे सकाळी महावीर इंटरनॅशनलच्या वतीने यशस्वी चातुर्मास संपन्न झाला. त्याबद्दल गुरुंचा कृतज्ञता सोहळा (उपकार स्मृती) प्रसंगी महाराज बोलत होते. मुनीराज प.पू. मुक्तीभूषण विजयजी महाराज यांनी आपल्या प्रवचनात प्रत्येक मानवाच्या जीवनात समर्पणाची भावना आली पाहिजे, असे सांगितले.यावेळी प.पू. मुनीराज मैत्रिभूषण विजयजी महाराज म्हणाले की, प्रत्येक मानवाची अपेक्षा वाढते आहे. एकपद मिळालेली दुसऱ्या पदावर माणूस जातो. परंतु त्याबरोबर धर्माची शिदोरी कमी होत चालली याची खंत असल्याचे सांगून शांततेचे अधिष्ठान जप, तप, त्याग याला महत्त्व दिले पाहिजे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना माजीमंत्री विनायकदादा पाटील यांनी जैन धर्मात अहिंसेला फार महत्त्वाचे स्थान आहे. एकवेळ दीक्षा घेणे सोपे पण निभावणे कठीण असल्याचे सांगितले, तर माजी महापौर दशरथ पाटील यांनी शास्त्रीयदृष्ट्यादेखील जैन धर्माचे तत्त्वज्ञान महत्त्वाचे आहे, असे सांगितले.याप्रसंगी गौतम सुराणा राजेंद्र पारिक, प्रकाश बोथरा यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत अनिल नहार यांनी केले. कार्यक्रमास बेबीलाल संचेती, राजेंद्र बाफना, पृथ्वीराज बोरा, विलासभाई शहा, प्रवीण शहा, शरदभाई शहा, महेश शहा, गिरीश शहा, भुपेंद्र शहा, अनुजभाई शहा आदिंसह मान्यवर व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन इंटरनॅशनलच्या वतीने करण्यात आले होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक