शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

थंडीचा जोर ओसरल्याने शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 18:46 IST

सायखेडा : निफाड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या थंडीचा जोर कमी झाला आहे. दहा दिवस प्रचंड थंडी असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

सायखेडा : निफाड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या थंडीचा जोर कमी झाला आहे. दहा दिवस प्रचंड थंडी असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. द्राक्षबाग आणि इतर अनेक पिकांना जास्त थंडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी धास्तावले होते, जनावरांचा प्रश्न निर्माण झाला होता. दोन दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आले आहेउत्तर भारतात सर्वत्र थंडी वाढल्याने त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्यात झाला जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमान निफाड तालुक्यात होते. दोन दिवस उणे तापमान तर पाच दिवस दोन अंशाखाली आले होते तर तीन दिवस पाच अंशाच्या आत बाहेर होते. त्यामुळे सलग दहा ते बारा दिवस तापमान कमी असल्याचा दहावर्षातील विक्र म नोंदविला गेला. थंडीचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि मुके जनावरे यांना बसला द्राक्ष मन्यांना तडे गेले , पाने पिवळी पडली, वेल करपून गेले, फुगवण थांबली होती, भुरी नियंत्रणासाठी शेतकर्यांना कसरत करावी लागली औषधांचा वापर वाढला, बागेत शेकोटी करावी लागली, साड्यांचे आच्छादन पसरले, पहाटे उठून पाणी द्यावे लागले अशा विविध योजना सुरू ठेऊन शेतकर्यांनी बागा वाचवल्या आहेत.अनेक ठिकाणी मुक्या जनावरांची हाल झाले. रात्रंदिवस थंडीत कुडकुडणारे जनावरांची चारा उपलब्ध होत नसल्याने हाल झाले. दोन दिवसांपासून थंडी कमी झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. पीक वाचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी