शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

अर्जुनसागर, चणकापूरमधून सोडले आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 18:41 IST

कळवण : कसमादे परिसराचा पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तालुक्यातील अर्जुनसागर धरणातून २५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन पुनद नदीपात्रात तर चणकापूर धरणातून ४५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन गिरणा नदीपात्रात सोमवारी सोडण्यात आले अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंता वैशाली ठाकरे यांनी दिली.दरम्यान कळवण, देवळा, सटाणा सह मालेगाव तालुक्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार असून दुष्काळाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देदुष्काळाने हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा

कळवण : कसमादे परिसराचा पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तालुक्यातील अर्जुनसागर धरणातून २५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन पुनद नदीपात्रात तर चणकापूर धरणातून ४५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन गिरणा नदीपात्रात सोमवारी सोडण्यात आले अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंता वैशाली ठाकरे यांनी दिली.दरम्यान कळवण, देवळा, सटाणा सह मालेगाव तालुक्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार असून दुष्काळाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.गेल्या महिन्याभरापासून बहुसंख्य गावातील विहिरींनी गाठलेला तळ यामुळे परिसरातील पाणीयोजना कोरड्या पडल्या असून अर्जुनसागर (पुनद) व चणकापूरच्या या आवर्तनाने पाणी योजनांना नवसंजीवनी मिळणार आहे. कसमादे परिसरातून पाण्याची वाढलेली मागणी व पदाधिकारी आणि नागरिकांनी आमदार नितीन पवार यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती.आमदार पवार यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी टंचाई लक्षात आणून देत कसमादेतील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन अर्जुनसागर धरणात शिल्लक असलेल्या ९५० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्यापैकी २५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन पुनद नदीपात्रात सोडावे व चणकापूर धरणात शिल्लक असलेल्या १४५० दशलक्ष घनफूट साठ्यापैकी या आवर्तनाच्या माध्यमातून गिरणा नदी पात्रात ८ ते १० दिवसात ११०० क्युसेसने ४५० दशलक्ष घनफूट पाणी सोडावे अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी केल्याने जिल्हाधिकारी यांनी अर्जुनसागर व चणकापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले.ऊन वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत कमी झाले आहे. त्यामुळे कसमादेच्या चारही तालुक्यांना अर्जुनसागर व चणकापूर धरणाच्या आवर्तनाच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. यामुळे यावर्षी पाण्याला अनन्यसाधारण महत्व आले असून पाणी आवर्तन सुरू असेपर्यंत अवैध वीजपंप चालवून कुणी पाणी उपसा करू नये म्हणून नदीकाठच्या या गावांमध्ये ८ ते १० तास भारनियमन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातRural Developmentग्रामीण विकास