शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अर्जुनसागर, चणकापूरमधून सोडले आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 18:41 IST

कळवण : कसमादे परिसराचा पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तालुक्यातील अर्जुनसागर धरणातून २५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन पुनद नदीपात्रात तर चणकापूर धरणातून ४५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन गिरणा नदीपात्रात सोमवारी सोडण्यात आले अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंता वैशाली ठाकरे यांनी दिली.दरम्यान कळवण, देवळा, सटाणा सह मालेगाव तालुक्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार असून दुष्काळाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देदुष्काळाने हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा

कळवण : कसमादे परिसराचा पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तालुक्यातील अर्जुनसागर धरणातून २५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन पुनद नदीपात्रात तर चणकापूर धरणातून ४५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन गिरणा नदीपात्रात सोमवारी सोडण्यात आले अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंता वैशाली ठाकरे यांनी दिली.दरम्यान कळवण, देवळा, सटाणा सह मालेगाव तालुक्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार असून दुष्काळाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.गेल्या महिन्याभरापासून बहुसंख्य गावातील विहिरींनी गाठलेला तळ यामुळे परिसरातील पाणीयोजना कोरड्या पडल्या असून अर्जुनसागर (पुनद) व चणकापूरच्या या आवर्तनाने पाणी योजनांना नवसंजीवनी मिळणार आहे. कसमादे परिसरातून पाण्याची वाढलेली मागणी व पदाधिकारी आणि नागरिकांनी आमदार नितीन पवार यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती.आमदार पवार यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी टंचाई लक्षात आणून देत कसमादेतील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन अर्जुनसागर धरणात शिल्लक असलेल्या ९५० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्यापैकी २५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन पुनद नदीपात्रात सोडावे व चणकापूर धरणात शिल्लक असलेल्या १४५० दशलक्ष घनफूट साठ्यापैकी या आवर्तनाच्या माध्यमातून गिरणा नदी पात्रात ८ ते १० दिवसात ११०० क्युसेसने ४५० दशलक्ष घनफूट पाणी सोडावे अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी केल्याने जिल्हाधिकारी यांनी अर्जुनसागर व चणकापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले.ऊन वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत कमी झाले आहे. त्यामुळे कसमादेच्या चारही तालुक्यांना अर्जुनसागर व चणकापूर धरणाच्या आवर्तनाच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. यामुळे यावर्षी पाण्याला अनन्यसाधारण महत्व आले असून पाणी आवर्तन सुरू असेपर्यंत अवैध वीजपंप चालवून कुणी पाणी उपसा करू नये म्हणून नदीकाठच्या या गावांमध्ये ८ ते १० तास भारनियमन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातRural Developmentग्रामीण विकास