शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शुल्काची होणार प्रतिपूर्तीं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:37 IST

अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम २० मेपर्यंत देणार असल्याची हमी शासनाचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिल्याची माहिती विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय व्यवस्थापन संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी मंगळवारी (दि.१४) दिली.

ठळक मुद्देशासनाची हमी : तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश

नाशिक : अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम २० मेपर्यंत देणार असल्याची हमी शासनाचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिल्याची माहिती विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय व्यवस्थापन संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी मंगळवारी (दि.१४) दिली.महाराष्ट्रातील २५० विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये व २०५ तंत्रनिकेतन महाविद्यालयांना याचा लाभ होणार असून, उच्च व तंत्रशिक्षण विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच आदिवासी विकास विभाग या तीनही विभागांकडून ही रक्कम संबंधित अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालये यांना प्राप्त होणार आहे. असोसिएशन आॅफ द मॅनेजमेंट अनएडेड इंजिनियरिंग कॉलेजतर्फे १५ डिसेंबर २०१७ रोजी व असोसिएशन आॅफ द मॅनेजमेंट आॅफ पॉलिटेक्निक्सतर्फे २५ जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयात याविषयी याचिका दाखल केली होती. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा शुल्क प्रतिपूर्तीचा पहिला टप्पा ७ आॅक्टोबर २०१८ पर्यंत तर शुल्क प्रतिपूर्तीचा दुसरा हप्ता २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत संबंधित विभागाने द्यावा, असा शासन निर्णय १३ सप्टेंबर २०१७ रोजी झालेला आहे. मात्र अद्यापही महाविद्यालयांना पहिला हप्ता पूर्णपणे मिळालेला नाही. तर दुसऱ्या हप्त्याची बहुतांश रक्कम प्रलंबित आहे.या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती बी. आर. गवई व डी. एस. नायडू यांच्या खंडपीठासमोर ३ मे रोजी झालेल्या सुनावणीत महा डीबीटी वेबपोर्टलवर विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयाची व विनाअनुदानित तंत्रनिकेतनची प्रलंबित रक्कम ती २० मे २०१९ पर्यंत संबंधित शासनाच्या विभागांकडून अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांना देणार असल्याची माहिती शासनाचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयासमोर दिलीआहे.दरम्यान, कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये काही त्रुटी असल्यास त्या शासनाच्या संबंधित विभागाकडून महाविद्यालयांना कळविण्यात येणार असून, या त्रुटींची पूर्तता महाविद्यालयांना करावी लागणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण