शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांचे उद्यापासून लेखणीबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 01:04 IST

सिन्नर: नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या मागण्यांंसंदर्भात शासनाकडे मागील 2 ते 3 वर्षापासून निवेदन सादर करण्यात आलेले आहेत. ...

ठळक मुद्देविभागातील कर्मचा-यांना मागणी करुन सुद्धा जीवन सुरक्षा वीमा कवच लागू केलेले नाही.

सिन्नर: नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या मागण्यांंसंदर्भात शासनाकडे मागील 2 ते 3 वर्षापासून निवेदन सादर करण्यात आलेले आहेत. मात्र शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्यावतीने उद्या गुरुवारपासून (दि.1) बेमुदत लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.नोंदणी व मुद्र्रांक विभागातील सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या तात्काळ करणे, कोरोना महामारी मध्ये मुद्रांक विभागातील सर्व कर्मचारी हे शासनाचे 30% उपस्थितीचे आदेश असताना 100 % उपस्थितीमध्ये काम करत आहेत तथापि विभागातील कर्मचा-यांना मागणी करुन सुद्धा जीवन सुरक्षा वीमा कवच लागू केलेले नाही. विभागामध्ये (कोवीड-19) या आजाराने ंआत्तापर्यंत 06 अधिकारी व कर्मचार्‍यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांना विमाकवच द्यावे, तुकडेबंदी कायद्याने होणार्‍या कारवाया, रेरा कायद्यामध्ये होणार्‍या कार्यवाही, सह दुय्यम निबंधक वर्ग -2 व दुय्यम निबंधक श्रेणी -1 संवर्गाचे एकत्रीकरण करणेबाबत, हार्डवेअर साहीत्य बाबत, आयकर विवरणपत्र, पोलीस विभाग व इतर विभागाकडून मागणी केल्या जाणार्‍या माहिती बाबत, आय-सरीता, ई-म्युटेशन, ग्रास व आधार सर्व्हर इत्यादी मागण्याबाबत तसेच शासनाकडून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कोणत्याही सोयी सहसचिव सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत.या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी यापुर्वीच घोषीत केल्याप्रमाणे गुरुवारपासून पासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात आले असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकान्वये देण्यात आली आहे. पत्रकावर संघटनेचे अध्यक्ष गजानन खोत, कार्याध्यक्ष अशोकराव चव्हाण, सचिव सागर पवार संस्थापक सल्लागार गोपीनाथराव कोळेकर, उपाध्यक्ष संतोष तायडे, सुधाकर निमजे, अनिल देशमुख, सुनिल वाडेवाले, अर्जुन वडये, अर्जुन वडये, राजेंद्र डोईफोडे, सुनिल पवार देवा चव्हाण, कल्याण कुलकर्णी, अनिल जगधने,संध्या रामटेके आदींची नावे आहेत.

 

टॅग्स :GovernmentसरकारRegistrarकुलसचिव