शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नाशिकच्या उद्योजकांना हवे विभागीय धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:18 IST

राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उद्योग धोरण ठरविल्यानंतरही त्या पलीकडे जाऊन विशिष्ट सवलती दिल्या जातात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या सवलतीच्या असमतोलापोटी अन्याय होत असल्याने आता विभागनिहाय औद्योगिक धोरण राबवावे, अशी मागणी नाशिकच्या उद्योजकांनी केली आहे.

नाशिक : राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उद्योग धोरण ठरविल्यानंतरही त्या पलीकडे जाऊन विशिष्ट सवलती दिल्या जातात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या सवलतीच्या असमतोलापोटी अन्याय होत असल्याने आता विभागनिहाय औद्योगिक धोरण राबवावे, अशी मागणी नाशिकच्या उद्योजकांनी केली आहे.राज्य सरकारचे अगोदरचे औद्योगिक धोरण संपून आता नवे धोरण आखले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत याबाबत मागणी होत असून, यासंदर्भात शासनाला शिष्टमंडळ भेटणार आहे. यापूर्वीच्या शासकीय औद्योगिक धोरणानंतरही शासनाकडून विविध विभागांना सवलती देण्यात आल्या. विशेषत: दोन ते तीन वर्षांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भावर मेहरनजर दाखवित राज्य शासनाने तेथील उद्योग क्षेत्रासाठी वीजदर कमी केले; मात्र अशाप्रकारची सवलत नाशिक विभागाला म्हणजे उत्तर महाराष्टÑाला देण्यात आली नव्हती. त्यामुळे उद्योजकांवर अन्याय झाल्याची भावना होती. नाशिकमध्ये तर राजकीय पक्षांनी त्याच्या विरोधात मोर्चेही काढले होते. त्यानंतर राज्य सरकारने नाशिक विभागाला सवलत दिली असली तरी त्यासाठी संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक विभागाचे वैशिष्ट्य, तेथील हवामान आणि पीक पद्धती या सर्वांचा विचार करून प्रादेशिक स्तरावरच धोरण आखावे, अशी नाशिकच्या उद्योग क्षेत्राची मागणी आहे. उद्योगमंत्र्यांकडे अशी मागणी करण्यात आली असली तरी शासनाचीदेखील भेट घेऊन तशी मागणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीNashikनाशिक