शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

लष्करी निर्बंधावर महापालिका ठाम

By admin | Updated: March 30, 2017 00:13 IST

नाशिक : लष्करी हद्दीभोवती संरक्षण खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नवीन बांधकामांवर निर्बंध कायम आहे.

नाशिक : लष्करी हद्दीभोवती संरक्षण खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नवीन बांधकामांवर निर्बंध कायम असून सदर निर्बंधातून नाशिकला वगळण्यात आल्याबाबतचे कोणतेही स्पष्ट निर्देश अद्याप महापालिकेला प्राप्त झाले नसल्याचा दावा नगररचना विभागाच्या सूत्रांनी केला आहे.  २५ आॅक्टोबर २०१६ रोजी संरक्षण खात्याच्या मिळकत विभागाने एक पत्रक जारी केले आहे. त्यात लष्करी हद्दीपासून दहा मीटर अंतरापर्यंत बांधकाम निषिद्ध क्षेत्र असलेली १९३ ठिकाणे तर शंभर मीटरपर्यंत निर्बंध असलेल्या १४४ ठिकाणांची यादी दिलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लष्कराने बांधकामावर घातलेल्या निर्बंधावर चर्चा सुरू होऊन परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र, यासंबंधी घोषित झालेल्या ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन याद्यांमध्ये नाशिकचे नावच नसल्याचे मत महापालिकेच्या निवृत्त शहर अभियंत्याने नोंदविल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु, महापालिकेच्या नगररचना विभागाशी याबाबत संपर्क साधला असता, नाशिकचे नाव वगळण्याबाबतचे कोणतेही स्पष्ट निर्देश महापालिकेला प्राप्त झाले नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११ मध्ये लष्कराने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानुसार, हद्दीपासून शंभर मीटर अंतराच्या आत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही. तसेच १०१ ते ५०० मीटर अंतराच्या परिघात नवे बांधकाम करताना केवळ पंधरा मीटर उंचीपर्यंतच बांधकाम करता येईल. त्यामुळे सदर मार्गदर्शक तत्त्वानुसार शासनाकडेही महापालिकेने पत्रव्यवहार करून मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार, लष्करी हद्दीलगत बांधकाम करताना अगोदर लष्कराचा ना हरकत दाखला सक्तीचा करण्यात आला आहे. सन २०१६ मध्ये संरक्षण खात्याच्या मिळकत विभागाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केवळ सुधारणा केली आहे. त्यात सुधारित तत्त्वे कोणत्या शहरांसाठी लागू होतील, त्याची यादी देण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिकचे नाव नसल्याने नाशिकवरील निर्बंध कायम असल्याचा दावाही सूत्राने बोलताना केला. (प्रतिनिधी)संभ्रमावस्था ‘जैसे थे’महापालिकेच्या नगररचना विभागाने लष्करी हद्दीतील बांधकामाबाबत अद्यापही मनाई असल्याचा दावा केला आहे, तर मनपाच्याच निवृत्त अभियंत्याने सदर निर्बंधातून नाशिकला वगळल्याचे मत नोंदविले आहे. त्यामुळे निर्बंधाबाबत संभ्रमावस्था जैसे थे आहे.