शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

लष्करी निर्बंधावर महापालिका ठाम

By admin | Updated: March 30, 2017 00:13 IST

नाशिक : लष्करी हद्दीभोवती संरक्षण खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नवीन बांधकामांवर निर्बंध कायम आहे.

नाशिक : लष्करी हद्दीभोवती संरक्षण खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नवीन बांधकामांवर निर्बंध कायम असून सदर निर्बंधातून नाशिकला वगळण्यात आल्याबाबतचे कोणतेही स्पष्ट निर्देश अद्याप महापालिकेला प्राप्त झाले नसल्याचा दावा नगररचना विभागाच्या सूत्रांनी केला आहे.  २५ आॅक्टोबर २०१६ रोजी संरक्षण खात्याच्या मिळकत विभागाने एक पत्रक जारी केले आहे. त्यात लष्करी हद्दीपासून दहा मीटर अंतरापर्यंत बांधकाम निषिद्ध क्षेत्र असलेली १९३ ठिकाणे तर शंभर मीटरपर्यंत निर्बंध असलेल्या १४४ ठिकाणांची यादी दिलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लष्कराने बांधकामावर घातलेल्या निर्बंधावर चर्चा सुरू होऊन परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र, यासंबंधी घोषित झालेल्या ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन याद्यांमध्ये नाशिकचे नावच नसल्याचे मत महापालिकेच्या निवृत्त शहर अभियंत्याने नोंदविल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु, महापालिकेच्या नगररचना विभागाशी याबाबत संपर्क साधला असता, नाशिकचे नाव वगळण्याबाबतचे कोणतेही स्पष्ट निर्देश महापालिकेला प्राप्त झाले नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११ मध्ये लष्कराने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानुसार, हद्दीपासून शंभर मीटर अंतराच्या आत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही. तसेच १०१ ते ५०० मीटर अंतराच्या परिघात नवे बांधकाम करताना केवळ पंधरा मीटर उंचीपर्यंतच बांधकाम करता येईल. त्यामुळे सदर मार्गदर्शक तत्त्वानुसार शासनाकडेही महापालिकेने पत्रव्यवहार करून मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार, लष्करी हद्दीलगत बांधकाम करताना अगोदर लष्कराचा ना हरकत दाखला सक्तीचा करण्यात आला आहे. सन २०१६ मध्ये संरक्षण खात्याच्या मिळकत विभागाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केवळ सुधारणा केली आहे. त्यात सुधारित तत्त्वे कोणत्या शहरांसाठी लागू होतील, त्याची यादी देण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिकचे नाव नसल्याने नाशिकवरील निर्बंध कायम असल्याचा दावाही सूत्राने बोलताना केला. (प्रतिनिधी)संभ्रमावस्था ‘जैसे थे’महापालिकेच्या नगररचना विभागाने लष्करी हद्दीतील बांधकामाबाबत अद्यापही मनाई असल्याचा दावा केला आहे, तर मनपाच्याच निवृत्त अभियंत्याने सदर निर्बंधातून नाशिकला वगळल्याचे मत नोंदविले आहे. त्यामुळे निर्बंधाबाबत संभ्रमावस्था जैसे थे आहे.