शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

अवकाळी पावसामुळे फुलकळ्या गळून पडल्याने अ‍ॅपल बोरांच्या उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 18:06 IST

मानोरी : दीड महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अ‍ॅपल बोरच्या झाडांना बसला असून अवकाळी पाऊस बरसण्याच्या दरम्यान या अ‍ॅपलबोर फळ झाडांना लागलेल्या फुलकळ्या गळून पडल्याने यंदा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याहून अधिक घट उत्पादनात झाली आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका

मानोरी : दीड महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अ‍ॅपल बोरच्या झाडांना बसला असून अवकाळी पाऊस बरसण्याच्या दरम्यान या अ‍ॅपलबोर फळ झाडांना लागलेल्या फुलकळ्या गळून पडल्याने यंदा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याहून अधिक घट उत्पादनात झाली आहे.येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शेतकरी भिवाजी गोडगे यांना गतवर्षी अ‍ॅपल बोर मधून एक लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. यंदा देखील मोठ्या अपेक्षेप्रमाणे लाखो रु पये खर्चून अ‍ॅपल बोरचे उत्पादन घेतले होते. मात्र फुलकळ्या गळून पडल्याने यंदा अ‍ॅपल बोरच्या उत्पादनात घट झाली आहे.पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत गोडगे यांनी मोठ्या मेहनतीने एक एकर शेतात अ‍ॅपल बोर फळबाग लागवड केली आहे. १० बाय १५ ईतक्या अंतरावर या अ‍ॅपल बोरच्या झाडांची लागवड केली आहे. ही झाडे जोपासण्यासाठी लाखो रु पये खर्च करून शेत हिरवेगार केले आहे. मात्र दीड महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने या अ‍ॅपल बोरांच्या झाडांना लागलेल्या फुलकळ्याच गळून पडल्याने शेतकरी चिंतातुर झालेला असताना त्याचा परिणाम आता थेट बोरांच्या उत्पादनावर होत असल्याचे दिसून आले आहे.मागील वर्षी फुलकळ्या लागल्या नंतर एका झाडाला कमीत कमी तीन कॅरेट्स म्हणजेच साथ किलो इतके बोरांचे भरगोस उत्पादन निघत असताना भाव देखील चांगल्या प्रकारे मिळत होता. यंदा मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्याने झाडांच्या फुलकळ्या गडून पडल्याने अ‍ॅपल बोरांचे उत्पादन घटले असून एका झाडाला केवळ एकच कॅरेट्स म्हणजेच वीस किलो इतके फळ निघत असल्याने व भाव देखील कमी प्रमाणात मिळत असल्याने उत्पादन खर्च फिटणे देखील यंदा महाग झाला आहे. येवला, लासलगाव, कोपरगाव, निफाड आदी बाजार समित्यांमध्ये अ‍ॅपल बोरांना प्रतिकिलो पंचवीस ते तीस रु पयांपर्यंत भाव मिळत असून मशागतीचा खर्च तर बाजूलाच गाडी भाडे फिटने देखील दुरापास्त झाले आहे.अवकाळी पावसाने अ‍ॅपल बोरांच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या अवकाळी पावसाने एक एकरातील अ‍ॅपल बोरांच्या झाडांच्या फुलकळ्याच गळून पडल्याने बोरांच्या उत्पादनात घट झाली असल्याने मागील वर्षीच्या तुलनेने यंदा निम्म्याहून अधिक बोरांचे उत्पादन घटले असून भाव देखील कमी मिळत असल्याने खर्च फिटने देखील आवाक्या बाहेर झाले आहे.- भिवाजी गोडगे,अ‍ॅपल बोर उत्पादक शेतकरी. 

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक