डाळिंबाची ‘लाली’ पोहचली उत्तर भारतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 05:42 PM2020-09-12T17:42:30+5:302020-09-12T17:48:12+5:30

मनमाड : परिसरातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरलेल्या किसान रेल्वेने महिनाभरात अकराशे टन पौष्टिक आणि प्रतिकारशक्ती वाढवणाºया डाळिंबाची उत्तर भारतात वाहतुक केली आहे. किसान रेल्वेच्या स्वस्त आणि वेगवान वाहतुकीमुळे डाळींबाची ‘लाली’ उत्तर भारतात जाऊन पोहचली आहे.

The 'redness' of pomegranate has reached North India | डाळिंबाची ‘लाली’ पोहचली उत्तर भारतात

डाळिंबाची ‘लाली’ पोहचली उत्तर भारतात

Next
ठळक मुद्देमनमाड : किसान रेल्वेने केली वाहतूक

गिरीश जोशी
मनमाड : परिसरातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरलेल्या किसान रेल्वेने महिनाभरात अकराशे टन पौष्टिक आणि प्रतिकारशक्ती वाढवणाºया डाळिंबाची उत्तर भारतात वाहतुक केली आहे. किसान रेल्वेच्या स्वस्त आणि वेगवान वाहतुकीमुळे डाळींबाची ‘लाली’ उत्तर भारतात जाऊन पोहचली आहे.
किसान रेल्वे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. नाशवंत माल जसे डाळींब, शिमला मिरची, फुलकोबी, लिंबू, हिरव्या मिरची, आईस्ड-फिश, जिवंत वनस्पती, अंडी आणि इतर भाज्याची वाहतूक मनमाड सह कोपरगाव, दौंड, नाशिक या भागांतून केली जात आहे. किसान रेल्वेने आतापर्यंत वाहून नेलेल्या एकूण नाशवंत मालापैकी ११२७.६७ टन डाळिंबची वाहतूक केली आहे.
ज्याचे प्रमाण एकूण नाशवंत मालाच्या सुमारे ६१ टक्के आहे. किसान रेल्वे साप्ताहिक सेवा म्हणून सुरू झाली आणि पुढे मुजफ्फरपूर पर्यंत विस्तारित करण्यात आली आणि त्यानंतर सांगोला / पुणे येथून मनमाड येथे लिंक रेल्वे जोडली जात आहे. आता किसान रेल त्रि-साप्ताहिक म्हणून चालू असून याला शेतकºयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेमुळे नाशवंत वस्तूंची वेगवान वाहतूक, नाशवंत वस्तूंची ताजी डिलेव्हरी, मालाच्या संख्येवर बंधन नाही, रस्त्यापेक्षा स्वस्त आणि टोलसह वाहतूक खर्चात बचत करणारी ठरली आहे. रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेल्वेमुळे वाहतुकीच्या इतर पद्धतींच्या तुलनेत वेळ कमी लागत असल्याने शेतकºयांकडून समाधान व्यक्त गेले जात आहे. (फोटो १२ मनमाड ४, ५)

Web Title: The 'redness' of pomegranate has reached North India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.