शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लाल वादळ शमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:37 IST

नाशिक : ‘एकच नारा, सातबारा कोरा’, ‘दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा’, ‘महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका’, ‘वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा’ आदी मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हजारो शेतकरी, आदिवासी बांधवांचा लाँग मार्च गुरुवारी (दि.२१) सकाळी नाशिकहून मुंबईच्या दिशेने झेपावला परंतु, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंंतर नाशिकच्या वेशीवरच लाल वादळ शमले. 

ठळक मुद्देलॉँग मार्च स्थगित : मुख्यमंत्र्यांशी चर्चा; नाशिकच्या वेशीवरच शिष्टाई सफल

नाशिक : ‘एकच नारा, सातबारा कोरा’, ‘दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा’, ‘महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका’, ‘वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा’ आदी मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हजारो शेतकरी, आदिवासी बांधवांचा लाँग मार्च गुरुवारी (दि.२१) सकाळी नाशिकहून मुंबईच्या दिशेने झेपावला परंतु, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंंतर नाशिकच्या वेशीवरच लाल वादळ शमले. नाशिकहून निघालेले हे लाल वादळ विल्होळी येथे दुपारच्या भोजनासाठी विसावल्यानंतर जिल्ह्णाचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत आंबे बहुला गावाजवळील एका खासगी आस्थापनेच्या कक्षात किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर बव्हंशी मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर, किसान सभेने लॉँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतला.महाराष्टÑ राज्य किसान सभेच्या वतीने दि. ६ ते १२ मार्च २०१८ या कालावधीत नाशिक ते मुंबई विधानभवनावर पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, वर्ष उलटूनही शासनाने बव्हंशी मागण्यांची पूर्तता न केल्याने शेतकरी, आदिवासींचे हे लाल वादळ पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने घोंगावले. आमदार जे. पी. गावित, डॉ. अशोक ढवळे आणि डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या लॉँग मार्चमध्ये राज्यभरातील हजारो शेतकरी, आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत. बुधवारी(दि.२०) दिवसभरातच हजारो शेतकरी, आदिवासी बांधव नाशिकमध्ये मुक्कामी आले होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री महाजन यांच्यासोबत किसान सभेचे राष्टÑीय अध्यक्ष अशोक ढवळे, आमदार जे.पी. गावित, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाशी चर्चा झाली. परंतु अपेक्षित असा तोडगा निघू शकला नव्हता. त्यामुळे नियोजनाप्रमाणे गुरुवारी (दि. २१) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास लॉँग मार्चने मुंबईच्या दिशेने कूच केले. काही वाहने पुढे गेल्यानंतर पाठीमागून हाती लाल झेंडे घेतलेले हजारो शेतकरी आदिवासी लॉँग मार्चमध्ये सहभागी झाले. या लॉँग मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी शेतकरी-आदिवासींमुळे महामार्ग लाल रंगाने काठोकाठ न्हाऊन निघाला होता. शहरातून जाणाºया महामार्गावरून जाणाºया या लॉँग मार्चमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचाही सामना स्थानिक नागरिकांना करावा लागला. घोषणाबाजी करत निघालेल्या या लॉँग मार्चमध्ये आदिवासी नृत्यासह विविध लोककलेचेही दर्शन घडविले जात होते. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, असा ठाम भाव प्रत्येक आंदोलकांच्या चेहºयावर झळकत होता. आता मागे फिरायचे नाही, असा निर्धार करत निघालेला हा लॉँग मार्च दुपारच्या सुमारास भोजनासाठी विल्होळीपुढील आंबेबहुला गावाजवळील एका मैदानात विसावला. याच आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार नितीन भोसले, जयंत जाधव यांनीही सहभागी होत आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. दरम्यान, या लॉँग मार्चच्या मार्गावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.गिरीश महाजन, जयकुमार रावल चर्चेत सहभागीविल्होळी पुढे असलेल्या आंबेबहुला गावाजवळ लॉँग मार्च दुपारच्या भोजनासाठी विसावल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले. या चर्चेत आमदार जे. पी. गावित, डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले यांच्यासह नितीन भोसले सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त रवंींद्रकुमार सिंगल, ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे आदी अधिकारीवर्गही उपस्थित होता. याशिवाय बैठकीच्या वेळी भाजपाचे नाशिकमधील तीनही आमदार व काही पदाधिकारी उपस्थित होते.मोर्चेकºयांनी आपल्या विविध मागण्या मंत्रिमहोदयांसमोर ठेवल्या. अखेरीस मुख्यमंत्र्यांशीही झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय किसान सभेच्या वतीने घेण्यात आला.विविध मागण्यांसंबंधी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून त्यात प्रामुख्याने, पश्चिम वाहिन्यांचे पाणी महाराष्टÑासाठीच वापरण्याचे आश्वासित करण्यात आले आहे. याशिवाय, दर दोन महिन्यांनी या प्रश्नांचा पाठपुरावा केला जाईल.- गिरीश महाजन, पालकमंत्री, नाशिक