शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
5
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
6
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
7
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
8
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
9
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
10
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
11
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
12
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
13
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
14
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
15
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
17
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
18
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
19
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
20
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?

पालखेडच्या आवर्तनाने शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:34 IST

रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असतांना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपासून पालखेड कालव्यास पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गाने केली होती.

ठळक मुद्देपाटोदा : परिसरात आनंदाचे वातावरण

पाटोदा : रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असतांना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपासून पालखेड कालव्यास पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गाने केली होती. तसेच यासंदर्भात मागील आठवडयात मंत्रालयात पालकमंत्री छगन भुजबळ व दादा भुसे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती.यावर्षी कालवा व धरण लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस ओव्हरफ्लो आवर्तन सोडण्यात आले होते.या आवर्तनातून येवला तालुक्यातील सर्व लहान- मोठे बंधारे भरण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी पिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.गहू, हरभरा व भाजीपाला पिके घेण्यात आली आहेत. मात्र काही दिवसांपासून विहिरीतील पाण्याचा उपसा लवकर होत असल्याने पिकांना पाणीटंचाईचा फटका बसला होता. त्याचप्रमाणे येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष व डाळिंब बागा असून त्यांनाही पाणीटंचाईची झळ बसण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्गातून आवर्तन सोडण्याची मागणी होत होती.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रWaterपाणी