शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

आरटीईअंतर्गत ६१५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:57 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांसाठी प्रवेशप्रक्रि या राबविण्यात येत असून, पहिल्या फेरीत आतापर्यंत ६१५ प्रवेश निश्चित झाले आहेत.

नाशिक : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांसाठी प्रवेशप्रक्रि या राबविण्यात येत असून, पहिल्या फेरीत आतापर्यंत ६१५ प्रवेश निश्चित झाले आहेत. या फेरीत पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या तीन हजार विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत (दि. २४) प्रवेश घेता येणार असून, त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी प्रवेशाची संधी मिळालेल्या शाळेत आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले  आहे. आरटीईअंतर्गत पूर्व प्राथमिक व पहिलीसाठी जिल्ह्यातील ४६६ शाळांमध्ये साडेसहा हजार जागांसाठी सुमारे साडेदहा हजार विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले असून, या अर्जांच्या आधारे प्राथमिक शिक्षण विभागाने पहिली सोडत काढली होती. या सोडतीमध्ये तीन हजार विद्यार्थ्यांना आरटीईच्या पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळाली असून, १४ मार्चपासून विद्यार्थ्यांना जिल्हाभरातील विविध शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत सुमारे ६१६ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित केले आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत प्रवेश घेण्याची संधी आहे. पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत प्रवेश मिळण्यास आलेल्या अडचणींविषयी प्राप्त तक्रारींवर निर्णय झाल्यानंतर रिक्त असणाऱ्या जागांचा आढावा घेऊन शाळेपासून १ ते ३ किलोमीटर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी दुसरी सोडत काढण्यात येणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा