शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
3
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
4
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
5
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
6
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
7
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
8
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
9
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
10
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
11
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
12
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
13
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
14
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
15
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
16
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
17
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

पत्नीचा अधिक पगार ठरतोय ‘गृहकलहाचे’ कारण

By संदीप भालेराव | Updated: March 17, 2019 01:03 IST

सुख-दु:खात एकमेकांशी आयुष्यभराची साथ करण्याच्या आणाभाका घेत प्रेमविवाह केलेल्या अलीकडील पती-पत्नीचा संसार अल्पायुषी ठरत आहे. शिकलेल्या बायकोला असलेला जास्त पगार आणि कमी शिकलेल्या नवरोबाला होणारा कमी पगार किंवा बेरोजगारी यातून निर्माण झालेल्या ‘इगो’मुळे नवरा-बायकोमधील गृहकलह वाढत असल्याचा निष्कर्ष नाशिकच्या कौटुंबिक सल्ला केंद्राने काढला आहे.

नाशिक : सुख-दु:खात एकमेकांशी आयुष्यभराची साथ करण्याच्या आणाभाका घेत प्रेमविवाह केलेल्या अलीकडील पती-पत्नीचा संसार अल्पायुषी ठरत आहे. शिकलेल्या बायकोला असलेला जास्त पगार आणि कमी शिकलेल्या नवरोबाला होणारा कमी पगार किंवा बेरोजगारी यातून निर्माण झालेल्या ‘इगो’मुळे नवरा-बायकोमधील गृहकलह वाढत असल्याचा निष्कर्ष नाशिकच्या कौटुंबिक सल्ला केंद्राने काढला आहे.गृहकलह प्रत्येक घरात होत असतोच. आताचा काळही त्याला अपवाद नाही. संसारात काही कुरबुरी असल्या तरी फार मोठे काही घडल्याशिवाय भांडणे चार भिंंतीच्या बाहेर येत नव्हती. आधुनिक काळात तर भांडणाची अचंबित करणारी कारणेही समोर आली आहेत. संसार करीत असताना समज-गैरसमजावरून होणारे वाद इथपर्यंत समजण्यासारखे आहे. परंतु प्रेमात पडल्यानंतर अल्पावधीच लग्नगाठ बांधणाऱ्या कॉलेज तरुण-तरुणींमध्ये आपसातील ‘इगो’ संसार मोडण्यास कारणीभूत ठरत असल्याचे कौटुंबिक सल्ला केंद्राकडे येणाऱ्या तक्रारीवरून दिसून आले आहे.महाविद्यालयात शिकत असताना मुले-मुली प्रेमात पडतात आणि काहीकाळानंतर लग्नगाठही बांधतात. शिक्षणात मुली आघाडीवर असल्याने शक्यतो मुलगी अधिक शिकलेली तर मुलाचे शिक्षण त्यामानाने कमी असते. प्रेमविवाह असल्याने शक्यतो विभक्त आणि प्रकरणात एकत्र कुटुंबात त्यांचा संसार सुरू होतो. अशावेळी दोघेही नोकरी पत्करतात. शिक्षनानुसार पत्नीला असलेला जास्त पगार आणि पतीला कमी पगार हा कालांतराने गृहकलहाला कारणीभूत ठरतो आणि त्यातून संसारात वाद सुरू होतात.नाशिक शहरात अशा प्रकारच्या तक्रारींचे प्रमाणे २५ ते ३० टक्के असल्याचा दावा नाशिकच्या महिला हक्क संरक्षण समिती संचलित कौटुंबिक सल्ला केंद्राने केला आहे. तक्रारी दोन्ही पक्षाकडून केल्या जातात. पती अपेक्षित कमावत नसल्याची पत्नीची तक्रार असते तर पत्नी पगाराच्या जोरावर घरात वर्चस्व निर्माण करीत असल्याची पतीची तक्रार असते. अशा प्रकारच्या महिन्यात दहा तरी तक्रारी दाखल होत आहेत.अलीकडच्या काळात प्रेम करताना कोणतीही बाब त्यांचा व्यर्ज नसते. लग्नानंतर मात्र ‘आटे डाल का भाव’ त्यांना माहिती होतो. अशा केसेस अत्यंत नाजूकपणे हाताळण्याची आवश्यकता असल्याने अशा प्रकारच्या दरमहा किमान दहा तरी कसेस सोडवाव्या लागतात. त्यांचे समुपदेशन करावे लागते. तडजोडीनंतर संबंधित कुटुंबाला अचानक भेट देऊन कुटुंबातील खुशाली पाहण्याची जबाबरी महिला हक्क बजावत असून ‘इगो’ असलेल्या महिलेला आणि पुरुषालाही समजावून सांगणे कठीण होऊन बसते. त्यामुळे हा तिढा अत्यंत कौशल्यतेने सोडवावा लागतो.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय