शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

पत्नीचा अधिक पगार ठरतोय ‘गृहकलहाचे’ कारण

By संदीप भालेराव | Updated: March 17, 2019 01:03 IST

सुख-दु:खात एकमेकांशी आयुष्यभराची साथ करण्याच्या आणाभाका घेत प्रेमविवाह केलेल्या अलीकडील पती-पत्नीचा संसार अल्पायुषी ठरत आहे. शिकलेल्या बायकोला असलेला जास्त पगार आणि कमी शिकलेल्या नवरोबाला होणारा कमी पगार किंवा बेरोजगारी यातून निर्माण झालेल्या ‘इगो’मुळे नवरा-बायकोमधील गृहकलह वाढत असल्याचा निष्कर्ष नाशिकच्या कौटुंबिक सल्ला केंद्राने काढला आहे.

नाशिक : सुख-दु:खात एकमेकांशी आयुष्यभराची साथ करण्याच्या आणाभाका घेत प्रेमविवाह केलेल्या अलीकडील पती-पत्नीचा संसार अल्पायुषी ठरत आहे. शिकलेल्या बायकोला असलेला जास्त पगार आणि कमी शिकलेल्या नवरोबाला होणारा कमी पगार किंवा बेरोजगारी यातून निर्माण झालेल्या ‘इगो’मुळे नवरा-बायकोमधील गृहकलह वाढत असल्याचा निष्कर्ष नाशिकच्या कौटुंबिक सल्ला केंद्राने काढला आहे.गृहकलह प्रत्येक घरात होत असतोच. आताचा काळही त्याला अपवाद नाही. संसारात काही कुरबुरी असल्या तरी फार मोठे काही घडल्याशिवाय भांडणे चार भिंंतीच्या बाहेर येत नव्हती. आधुनिक काळात तर भांडणाची अचंबित करणारी कारणेही समोर आली आहेत. संसार करीत असताना समज-गैरसमजावरून होणारे वाद इथपर्यंत समजण्यासारखे आहे. परंतु प्रेमात पडल्यानंतर अल्पावधीच लग्नगाठ बांधणाऱ्या कॉलेज तरुण-तरुणींमध्ये आपसातील ‘इगो’ संसार मोडण्यास कारणीभूत ठरत असल्याचे कौटुंबिक सल्ला केंद्राकडे येणाऱ्या तक्रारीवरून दिसून आले आहे.महाविद्यालयात शिकत असताना मुले-मुली प्रेमात पडतात आणि काहीकाळानंतर लग्नगाठही बांधतात. शिक्षणात मुली आघाडीवर असल्याने शक्यतो मुलगी अधिक शिकलेली तर मुलाचे शिक्षण त्यामानाने कमी असते. प्रेमविवाह असल्याने शक्यतो विभक्त आणि प्रकरणात एकत्र कुटुंबात त्यांचा संसार सुरू होतो. अशावेळी दोघेही नोकरी पत्करतात. शिक्षनानुसार पत्नीला असलेला जास्त पगार आणि पतीला कमी पगार हा कालांतराने गृहकलहाला कारणीभूत ठरतो आणि त्यातून संसारात वाद सुरू होतात.नाशिक शहरात अशा प्रकारच्या तक्रारींचे प्रमाणे २५ ते ३० टक्के असल्याचा दावा नाशिकच्या महिला हक्क संरक्षण समिती संचलित कौटुंबिक सल्ला केंद्राने केला आहे. तक्रारी दोन्ही पक्षाकडून केल्या जातात. पती अपेक्षित कमावत नसल्याची पत्नीची तक्रार असते तर पत्नी पगाराच्या जोरावर घरात वर्चस्व निर्माण करीत असल्याची पतीची तक्रार असते. अशा प्रकारच्या महिन्यात दहा तरी तक्रारी दाखल होत आहेत.अलीकडच्या काळात प्रेम करताना कोणतीही बाब त्यांचा व्यर्ज नसते. लग्नानंतर मात्र ‘आटे डाल का भाव’ त्यांना माहिती होतो. अशा केसेस अत्यंत नाजूकपणे हाताळण्याची आवश्यकता असल्याने अशा प्रकारच्या दरमहा किमान दहा तरी कसेस सोडवाव्या लागतात. त्यांचे समुपदेशन करावे लागते. तडजोडीनंतर संबंधित कुटुंबाला अचानक भेट देऊन कुटुंबातील खुशाली पाहण्याची जबाबरी महिला हक्क बजावत असून ‘इगो’ असलेल्या महिलेला आणि पुरुषालाही समजावून सांगणे कठीण होऊन बसते. त्यामुळे हा तिढा अत्यंत कौशल्यतेने सोडवावा लागतो.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय