शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा अधिक पगार ठरतोय ‘गृहकलहाचे’ कारण

By संदीप भालेराव | Updated: March 17, 2019 01:03 IST

सुख-दु:खात एकमेकांशी आयुष्यभराची साथ करण्याच्या आणाभाका घेत प्रेमविवाह केलेल्या अलीकडील पती-पत्नीचा संसार अल्पायुषी ठरत आहे. शिकलेल्या बायकोला असलेला जास्त पगार आणि कमी शिकलेल्या नवरोबाला होणारा कमी पगार किंवा बेरोजगारी यातून निर्माण झालेल्या ‘इगो’मुळे नवरा-बायकोमधील गृहकलह वाढत असल्याचा निष्कर्ष नाशिकच्या कौटुंबिक सल्ला केंद्राने काढला आहे.

नाशिक : सुख-दु:खात एकमेकांशी आयुष्यभराची साथ करण्याच्या आणाभाका घेत प्रेमविवाह केलेल्या अलीकडील पती-पत्नीचा संसार अल्पायुषी ठरत आहे. शिकलेल्या बायकोला असलेला जास्त पगार आणि कमी शिकलेल्या नवरोबाला होणारा कमी पगार किंवा बेरोजगारी यातून निर्माण झालेल्या ‘इगो’मुळे नवरा-बायकोमधील गृहकलह वाढत असल्याचा निष्कर्ष नाशिकच्या कौटुंबिक सल्ला केंद्राने काढला आहे.गृहकलह प्रत्येक घरात होत असतोच. आताचा काळही त्याला अपवाद नाही. संसारात काही कुरबुरी असल्या तरी फार मोठे काही घडल्याशिवाय भांडणे चार भिंंतीच्या बाहेर येत नव्हती. आधुनिक काळात तर भांडणाची अचंबित करणारी कारणेही समोर आली आहेत. संसार करीत असताना समज-गैरसमजावरून होणारे वाद इथपर्यंत समजण्यासारखे आहे. परंतु प्रेमात पडल्यानंतर अल्पावधीच लग्नगाठ बांधणाऱ्या कॉलेज तरुण-तरुणींमध्ये आपसातील ‘इगो’ संसार मोडण्यास कारणीभूत ठरत असल्याचे कौटुंबिक सल्ला केंद्राकडे येणाऱ्या तक्रारीवरून दिसून आले आहे.महाविद्यालयात शिकत असताना मुले-मुली प्रेमात पडतात आणि काहीकाळानंतर लग्नगाठही बांधतात. शिक्षणात मुली आघाडीवर असल्याने शक्यतो मुलगी अधिक शिकलेली तर मुलाचे शिक्षण त्यामानाने कमी असते. प्रेमविवाह असल्याने शक्यतो विभक्त आणि प्रकरणात एकत्र कुटुंबात त्यांचा संसार सुरू होतो. अशावेळी दोघेही नोकरी पत्करतात. शिक्षनानुसार पत्नीला असलेला जास्त पगार आणि पतीला कमी पगार हा कालांतराने गृहकलहाला कारणीभूत ठरतो आणि त्यातून संसारात वाद सुरू होतात.नाशिक शहरात अशा प्रकारच्या तक्रारींचे प्रमाणे २५ ते ३० टक्के असल्याचा दावा नाशिकच्या महिला हक्क संरक्षण समिती संचलित कौटुंबिक सल्ला केंद्राने केला आहे. तक्रारी दोन्ही पक्षाकडून केल्या जातात. पती अपेक्षित कमावत नसल्याची पत्नीची तक्रार असते तर पत्नी पगाराच्या जोरावर घरात वर्चस्व निर्माण करीत असल्याची पतीची तक्रार असते. अशा प्रकारच्या महिन्यात दहा तरी तक्रारी दाखल होत आहेत.अलीकडच्या काळात प्रेम करताना कोणतीही बाब त्यांचा व्यर्ज नसते. लग्नानंतर मात्र ‘आटे डाल का भाव’ त्यांना माहिती होतो. अशा केसेस अत्यंत नाजूकपणे हाताळण्याची आवश्यकता असल्याने अशा प्रकारच्या दरमहा किमान दहा तरी कसेस सोडवाव्या लागतात. त्यांचे समुपदेशन करावे लागते. तडजोडीनंतर संबंधित कुटुंबाला अचानक भेट देऊन कुटुंबातील खुशाली पाहण्याची जबाबरी महिला हक्क बजावत असून ‘इगो’ असलेल्या महिलेला आणि पुरुषालाही समजावून सांगणे कठीण होऊन बसते. त्यामुळे हा तिढा अत्यंत कौशल्यतेने सोडवावा लागतो.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय