शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

रवि पाटील, असाल तेथून परत या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:55 IST

रवि पाटील, तुम्ही असाल तेथून परत या. महापालिकेशी संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्कीच सोडवू, असे आवाहन महापौर रंजना भानसी यांनी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांना केले आहे.

नाशिक : रवि पाटील, तुम्ही असाल तेथून परत या. महापालिकेशी संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्कीच सोडवू, असे आवाहन महापौर रंजना भानसी यांनी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांना केले आहे. दरम्यान, महापौरांनी मंगळवारी (दि.२९) पाटील कुुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला, तर पोलीस आयुक्तांचीही भेट घेऊन तपासाला गती देण्याची विनंती केली.  महापालिकेतील नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील गेल्या शनिवार (दि.२६) पासून बेपत्ता आहेत. त्यांनी पाठीमागे ठेवलेल्या चिठ्ठीमुळे त्यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ वाढले आहे. पाटील यांच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झालेली आहेत मात्र, अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. त्यामुळे पाटील कुटुंबीय प्रचंड तणावाखाली आहे. मंगळवारी (दि.२९) महापौर रंजना भानसी यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी, महापौरांनी पत्रकारांशी बोलताना रवि पाटील हे जेथे कुठे असतील, त्यांनी तेथून परत यावे, असे आवाहन केले. महापालिकेशी संबंधित त्यांचे काही प्रश्न असतील तर ते सोडविले जातील, परंतु त्यांनी आपल्या कुटुंबीयासाठी टोकाचे पाऊल उचलू नये, असेही महापौरांनी सांगितले. महापालिकेतील अन्य कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांचीही दखल घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, महापौरांनी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांची भेट घेऊन तपासाच्या प्रगतीबद्दल चर्चा केली. यावेळी, पोलीस आयुक्तांनी तपासासाठी पोलीस पथके पाठविली असून, नातेवाइकांसह सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात असल्याचे सांगितले. यावेळी, महापौरांसमवेत स्थायी समिती सभापती हिमगौरी अहेर, नगरसेवक भगवान दोंदे उपस्थित होते.आयुक्तांच्या माजी पीएची पोस्टआयुक्त कार्यालयात यापूर्वी स्वीय सचिव म्हणून काम पाहणाºया कैलास दराडे यांनी सोशल मीडियावर कर्मचाºयांना आवाहन करणारी एक पोस्ट टाकली आहे. गेल्या सिंहस्थापासून मनपातील अधिकारी-कर्मचारी हे खरोखरच प्रचंड तणावाखाली काम करत असल्याचे सांगत दराडे यांनी आपले सहकारी ठाकरे आणि प्रवीण राजपूत यांचे आजारपणामुळे झालेल्या आकस्मिक मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. तणावाची स्थिती असली तरी स्वत:कडे दुर्लक्ष करू नका, आनंदी रहा, असे सांगत रवि पाटील लवकरच परत येतील, अशी आशा व्यक्त केली आहे.आसू आणि हसूरवींद्र पाटील यांची कन्या भाग्येशा सिम्बॉयसीस स्कूलमध्ये शिक्षण घेत असून, तिने इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. मंगळवारी सीबीएससी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात भाग्येशाने ८७ टक्के गुण संपादन केले. परंतु, एका डोळ्यात आसू आणि दुसºया डोळ्यात हसू अशी स्थिती अनुभवणाºया चिमुरड्या भाग्येशाला दहावीच्या निकालाचा आनंद घेता आला नाही. सोमवारी (दि.२८) भाग्येशाचा वाढदिवस होता, तर मंगळवारी (दि.२९) दहावीचा निकाल. या दोन्ही आनंदाच्या क्षणी पप्पांचा फोन येईल, या आशेने भाग्यश्री प्रतीक्षा करत होती. परंतु, काहीच प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीय प्रचंड तणावाखाली आहे.कामाचा ताणरवि पाटील यांच्या पत्नी शीतल यांनी म्हटले आहे, गेल्या काही दिवसांपासून अति कामामुळे ते तणावात होते. नवीन आयुक्त आल्यापासून त्यांच्या कामाचा ताण वाढला होता. शनिवारी (दि. २६) वॉक विथ कमिशनरला जायचे म्हणून ते सकाळी लवकर उठले. सोमवारी मुलीचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तरी त्यांचा फोन येईल याची आम्ही वाट पाहत होतो असे सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका