शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

सरसकटऐवजी गरज ओळखून करावी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:26 IST

सांगळे : पालकमंत्र्यांना घालणार साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे विकासकामांना सरसकट ३० ते ५० टक्के कपातीचा निर्णय आता विकासकामांच्या मुळावर उठणार आहे. जिल्हा नियोजन मंडळाने सरसकट ३० टक्के कपात करण्याऐवजी आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण विभागांच्या गरजा ओळखून ही कपात १५ ते २० टक्के करावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी केली आहे.बुधवारी (दि.१९) यासंदर्भात होणाऱ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांना याबाबत पत्र देऊन मागणी करणार असल्याचेही शीतल सांगळे यांनी सांगितले.जिल्ह्यात उघड्यावर भरणाऱ्या बिगर आदिवासी भागातील अंगणवाड्यांसाठी यापुढे एक रुपयाचाही निधी मिळणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यातच प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, प्राथमिक शाळा यांच्यासाठी नियोजित निधीला थेट ३० टक्के कपात करण्याचा निर्णय आरोग्य व शिक्षणाविषयक पायाभूत सुविधांपासून जनतेला परावृत्त करणारा आहे. शिक्षण व आरोग्यविषयक कामांसाठी सरसकट ३० टक्के कपात करण्याऐवजी गरज ओळखून १५ ते २० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केली आहे. त्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना भेटून त्यासंदर्भात मागणीचे निवेदन देणार असल्याचे सांगळे यांचे म्हणणे आहे. या सरसकट ३० टक्के निधी कपातीच्या निर्णयाने विकासकामांवर मोठा विपरीत परिणाम होणार असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेच्या बिगर आदिवासी भागातील काही अंगणवाड्या उघड्यावर, चावडीवर किंवा पारावर भरतात. त्यांना एकीकडे शासनाने निधी न देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा अंगणवाड्यांच्या कामांसाठी तरी जिल्हा नियोजन समितीकडून भरीव स्वरूपात निधी मिळणे अपेक्षित असल्याचे अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सांगितले.विभाजनाचे प्रस्ताव पाठवाच्आदिवासी व बिगर आदिवासी भागातील ग्रामपंचायतीच्या विभाजनाचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समित्यांनी तत्काळ जिल्हा परिषदेकडे पाठवावेत. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी या प्रस्तावांना शासन स्तरावरून तत्काळ मान्यता देण्याची ग्वाही दिल्याचे अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सांगितले. विभाजन करावयाच्या ग्रामपंचायतींमध्ये तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतर नसावे आणि लोकसंख्येचे निकष पाळणाऱ्या ग्रामपंचायतींचे तत्काळ विभाजन करण्यात येणार आहे. आदिवासी भागासाठी १ हजार तर बिगर आदिवासी भागासाठी दोन हजार लोकसंख्येचा निकष आहे.