शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आयटी पार्कच्या इमारतीचे दर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:00 IST

अंबड येथील आयटी पार्क इमारतीमधील जागेचे दर कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, गेल्या १५ वर्षांपासूनच्या मागणीला अखेर मुहूर्त सापडला आहे. या निर्णयामुळे नवउद्योजकांचे उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने उद्योग क्षेत्रात या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

सातपूर : अंबड येथील आयटी पार्क इमारतीमधील जागेचे दर कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, गेल्या १५ वर्षांपासूनच्या मागणीला अखेर मुहूर्त सापडला आहे. या निर्णयामुळे नवउद्योजकांचे उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने उद्योग क्षेत्रात या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.  आयटी उद्योगाला चालना मिळावी म्हणून अंबड औद्योगिक वसाहतीतील भूखंड क्रमांक एएम ५४ वर २००३ साली ६४०० चौरसमीटर जागेवर भव्य अशी आयटी पार्कची तीनमजली इमारत उभारण्यात आली होती. प्रत्येक मजल्यावर ५ असे १५ गाळे बांधून आयटी उद्योजकांना उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु या गाळ्यांचे शासकीय दर पाहून कोणीही गाळे विकत घेण्यास धजावले नाहीत. त्यानंतर गाळे भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु भाडे अधिक असल्याने कोणी भाडेतत्त्वावरसुद्धा घेण्यास तयार नव्हते. इमारत भाडेतत्त्वावर देण्यासाठी एमआयडीसीने २०१६ मध्ये निविदा काढली होती. परंतु बाजारभावापेक्षा एमआयडीसीचे दर अधिक असल्याने भाडेतत्त्वावर घेण्यास असमर्थता दर्शविण्यात आली होती. याबाबत तत्कालीन निमा पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हे दर काहीअंशी कमी करून २५ रुपये चौरसमीटर दराचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र हा दरदेखील जास्त असल्याने अजून दरात कपात करण्यात यावी. किमान १५ रुपये दर ठेवावा, अशी मागणी निमातर्फे करण्यात आली होती.दरम्यान, औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या २ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या सभेत अंबड आयटी पार्क गाळ्यांचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार तळमजल्यावरील गाळ्यांचे दर १३ रुपये, पहिला मजला ११ रुपये, दुसरा मजला १० रुपये चौरस फूट जीएसटीसह ठरविण्यात आला आहे. त्यात दरवर्षी १० टक्के भाडेवाढ आणि देखभाल व दुरुस्तीचा खर्च गाळेधारकांकडे सोपविण्यात आला आहे. उशिरा का होईना परंतु शासनाने अखेर भाडेवाढ कमी करण्याचा निर्णय घेतल्याने उद्योगवर्तुळात समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानNashikनाशिक