शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

सिन्नरच्या रतन इंडियाला ‘महाजनको’चा हात मिळण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 18:48 IST

शासनाच्या महाजनको कंपनीच्या वतीने रतन इंडिया ताब्यात घेण्याची तयारी केली जाते, मग एकलहरा येथील औष्णिक वीज केंद्राचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या एकलहरा औष्णिक वीज केंद्रातील वीज संच बंद करण्यात येत आहेत आणि दुसरीकडे रतन इंडियाला पायघड्या कशासाठी? असा प्रश्न खासदार हेमंत गोडसे यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्दे शासनाने केली चाचपणी १८ तारखेला होणार अंतिम निर्णय

नाशिक : सिन्नर येथील रतन इंडियाच्या तोट्यात गेलेल्या प्रकल्पाला सावरण्यासाठी अखेरीस महाजनकोचा पर्याय पुढे आला असून, या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चाचपणीदेखील केली आहे. येत्या १८ सप्टेंबर रोजी यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत सिन्नर येथे सुमारे ९०० एकर क्षेत्रात इंडिया बुल्स कंपनीने वीजनिर्मिती केंद्राचा प्रस्ताव दिला होता. तो मंजूर झाल्यानंतर त्यासाठी जागादेखील मिळाल्या. महापालिकेचे प्रक्रियायुक्त मलजल प्रकल्पाच्या ठिकाणी आणून त्यातील १३५० मेगावॉट वीज प्रकल्प साकारण्यात आला आहे. मुख्य वीज प्रकल्प साकारल्यानंतर अन्य उद्योगांसाठी जागादेखील देण्यात येणार आहे. मात्र सुरुवातीला या प्रकल्पासाठी अनेक अडचणी आल्या त्यातच एकलहरा ते सेझपर्यंत कोळसा वाहतुकीसाठी रेल्वेलाइनचे काम अर्धवट स्थितीत असल्याने जिल्ह्यातील शेकडो हातांना काम देणारा हा प्रकल्प उभा राहू शकलेला नाही. दरम्यान, रस्तामार्गाने कोळशाची वाहतूक करून या प्रकल्पावर कोळसा आणण्यात आला आणि १३५० मेगावॉट वीज प्रकल्पाची चाचणी करण्यात आली. याठिकाणी वीजनिर्मिती सुरू होत असली तरी प्रकल्पाकडून वीज खरेदी करण्यासाठी शासनाने रतन इंडियाशी वीज खरेदी करारच गेल्या तीन वर्षांत केलेला नाही. तीन वर्षांपासून कंपनीला उत्पन्न नसल्याने देणी थकली असून, हा प्रकल्प अडचणीत आला आहे.

तोट्यात आणि कर्जथकाबाकीमुळे अडचणीत आलेला हा प्रकल्प सावरण्यासाठी पॉवर फायनान्स कार्पाेरेशन या नियमन करणा-या कंपनीने हस्तक्षेप केला असून, विविध कंपन्यांना चालविण्यास देण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत. त्यानुसार महाजनकोनेदेखील प्रस्ताव सादर केला आहे. पॉवर कार्पोरेशनच्या मध्यस्थीने प्रकल्पाच्या पाहणीचे सोपस्कार पार पडले असून, १८ सप्टेंबर रोजी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज