शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रसिका शिंदे अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 02:34 IST

नाशिक : दहावीच्या निकालातही मुलींचेच वर्चस्व दिसून आले असून, नाशिक विभागातून ९०.२८ टक्के मुली तर ८५.१६ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातही उत्तीर्ण मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये ९१.४३ टक्के मुली, तर ८५.९६ टक्के च मुले उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागातून एकूण २ लाख ५४ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १ लाख ७४ हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे. नाशिकमध्ये रसिका शिंदे हिने शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवले असून, ती जिल्ह्यात पहिली आली आहे.

ठळक मुद्देदहावीच्या निकालातही मुलींचेच वर्चस्व

नाशिक : दहावीच्या निकालातही मुलींचेच वर्चस्व दिसून आले असून, नाशिक विभागातून ९०.२८ टक्के मुली तर ८५.१६ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातही उत्तीर्ण मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये ९१.४३ टक्के मुली, तर ८५.९६ टक्के च मुले उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागातून एकूण २ लाख ५४ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १ लाख ७४ हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे. नाशिकमध्ये रसिका शिंदे हिने शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवले असून, ती जिल्ह्यात पहिली आली आहे. नाशिक विभागात नाशिक जिल्ह्णात सर्वाधिक निकाल लागला असून, जिल्ह्णातील परीक्षेला प्रविष्ट ९० हजार २८३ विद्यार्थ्यांपैकी ८९ हजार ८७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.९६ व मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.४३ टक्के आहे. विभागातील धुळे जिल्ह्णात ६३ परीक्षा केंद्रांवर २९ हजार ९८ विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेत ८७.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात ८५.५१ टक्के मुले व ९०.१९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.जळगावमध्ये १३१ परीक्षा केंद्रांवर ६० हजार २४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी मुलांमध्ये ८५.७८ टक्के तर मुलींमध्ये ९१.२९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नंदुरबारमध्ये ४३ परीक्षा केंद्रांवर २० हजार ४३१ विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेत मुलांमध्ये ७९.०६ व मुलींमध्ये ८२.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. थोडक्यात, दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनीच आपले वर्चस्व सिद्ध केले असून, मुलांच्या तुलनेत विद्यार्थिनीच टॉपर ठरल्या आहेत. राज्याचा एकूण निकाल ८९.४१ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९६.१८ टक्के तर नाशिक विभागाचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत निकालाची टक्केवारी कमी होत चालली असली तरी यावर्षी विभागात नाशिक जिल्ह्णाचा निकाल अव्वल राहिला असून, नंदुरबारचा निकाल मागील वर्षीप्रमाणे यंदाही सर्वात कमी लागला आहे. दरम्यान, जुलै २०१८विभागात नाशिक प्रथमधुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्णांमध्ये नाशिकचा निकाल सर्वाधिक ८८.४७ टक्के लागला असून, धुळे ८७ टक्के, जळगाव ८८.०८ टक्के व नंदुरबारचा निकाल ८०.७४ टक्के लागला आहे. मध्ये होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने आवेदनपत्रे भरावयाची असून, त्यासाठी लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :educationशैक्षणिकSSC Results 2018दहावी निकाल २०१८