शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

जोरण परिसरात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: April 3, 2016 23:01 IST

जोरण परिसरात तीव्र पाणीटंचाई

जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे खोलवर जात असल्याची पाण्याची पातळी तसेच उन्हाळ्यात भूगर्भातील पाण्याचा साठा कमी झाला असून, विहिरींनी मात्र तळ गाठले आहेत. त्यामुळे परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे. अपुऱ्या पावसामुळे बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात नदी, नाले, लहान मोठे बंधारे, केटीविहीर यात पुरेशा पाण्याचा साठा झाला नाही तसेच अजून उन्हाळ्याचे दोन अडीच महिने शिल्लक असतानाच परिसरातील विहिरी मात्र कोरड्याठाक झाल्याचे भयानक चित्र बळीराजास भेडसावत आहे. सध्या फळबागांचे क्षेत्र संपूर्ण कांद्याने व्यापले असून, सिंचन पद्धतीऐवजी फ्लड पद्धतीमुळे प्रत्येक शेतकऱ्यास जास्त पाण्याची गरज भासू लागली आहे. पावसाचे पाणी अडविण्यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी दरवर्षी खर्च येतो; मात्र नेहमीप्रमाणे पाझरत येणाऱ्या निधीमधून स्वत:ची पोळी भाजून उरलेल्या निधीमधून ठेकेदारांकडून तयार करण्यात आलेले धरण, लहान मोठे केटीवेअर उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाझरून कोरडे होतात हे कळतदेखील नाही. एकूणच नैसर्गिक पाणीटंचाई असो, प्रत्येक वेळी बळी जातो तो फक्त बळीराजाचा. सुरुवातीस परिसरात मुबलक पाणी होते. त्याच पाण्याच्या भरोशावर शेतकऱ्यांनी कांदा, टमाटे, गहू आदि पिकांची लागवड केली होती; मात्र अचानक उष्णता वाढल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर जात असून, परिसरातील पिके वाया जाण्याचे संकेत दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य दिसून येत आहे़