शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची तयारी वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:23 IST

नाशिक तालुका पूर्व भागातील गावांमध्ये सध्या रब्बी हंगामाच्या शेतीकामांची लगबग सुरू आहे. काही ठिकाणी आडसाली सुरू उसाच्या तोडणीला सुरुवात झाली आहे.

एकलहरे : नाशिक तालुका पूर्व भागातील गावांमध्ये सध्या रब्बी हंगामाच्या शेतीकामांची लगबग सुरू आहे. काही ठिकाणी आडसाली सुरू उसाच्या तोडणीला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी गहू, हरभरा या पिकांची पेरणी पूर्ण होऊन त्याची मशागत व उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.  नाशिक तालुका पूर्व भाग व एकलहरे पंचक्रोशीतील सामनगाव, कोटमगाव, चाडेगाव, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरे गाव, गंगावाडी या भागातील शेतकरी रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीत व्यस्त आहेत. सध्या सर्वत्र जोरदार थंडी पडली असूून, या थंडीचा फायदा रब्बी पिकांना होतो. कडाक्याच्या थंडीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, कांदे ही पिके जोमाने वाढतात व त्यांना पाणीही कमी लागते. त्यामुळे या रब्बी पिकांसाठी थंडी वरदान ठरते. मात्र द्राक्षबागांसाठी हीच थंडी मारक ठरते. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षमण्यांच्या वाढीवर परिणाम होतो. तर ज्या मण्यांची वाढ यापूर्वीच झाली आहे त्यांना थंडीमुळे तडे जातात. म्हणून द्राक्षबागांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी चहुबाजूने ग्रीन नेट व वरून जाळीदार नेटचे आवरण लावले जात आहे.गहू,  हरभरा लागवड जोमातरब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गहू, हरभºयाची लागवड तालुक्याच्या पूर्व भागात केली जाते. येथील जमीन काळी कसदार व बारमाही पाण्याखाली असल्याने गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. काही ठिकाणी नोव्हेंबरच्या मध्यात गव्हाची पेरणी झाली आहे. तर काही ठिकाणी अजूनही शेतकरी गव्हाची पेरणी करीत आहेत. क्वचित ठिकाणी टोचन पद्धतीने हरभºयाची लागवड केलेली आहे.नाशिकचा ऊस नगरकडेनाशिक तालुक्यातील पूर्व भागात गोदावरी व दारणा नद्यांच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात ऊसलागवड करण्यात आली असून, आडसाली व सुरू ऊस तोडण्यासाठी ऊसतोड कामगारांचे जत्थे ठिकठिकाणी शेतांमध्ये कुडाच्या व उसाच्या पाचटाच्या झोपड्या करून मुक्कामाला थांबले आहेत. दिवसभर ऊसतोड करून, तो ट्रकमध्ये भरण्याचे काम मजुरांमार्फत केले जाते. नाशिक परिसरातील साखर कारखाने बंद असल्याने सध्या आपला ऊस नगर जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये पाठविला जात आहे. कारखान्यांचे गळीत सुरू होऊन परिसरात बºयापैकी ऊसतोड झाल्याने शेतात उरलेले पाचट तेथेच जाळण्यावर शेतकरी भर देत असून, पाचट जाळल्याने त्याची राख खोडव्याला खत म्हणून वापर केला जातो. पाणी भरल्यावर खोडवा पुन्हा जोमाने फुटतो, अशी शेतकºयांची धारणा आहे.उन्हाळ कांद्याची तयारीएकलहरे परिसरात उन्हाळ कांद्याच्या लागवडीची तयारी केली जात असून, त्यासाठी शेतकरी स्वत: रोपे तयार करीत आहे तर काही रोपे विकत आणून कांद्याची लागवड करतात. कांदा लागवडीसाठी मजुरांची वानवा असल्याने ठेकेदारी पद्धतीने मजूर उपलब्ध करून कांदा लागवड केली जाते.  यंदा कांदा लागवडीसाठी मजुरांची वानवा जाणवण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिकagricultureशेती