शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची तयारी वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:23 IST

नाशिक तालुका पूर्व भागातील गावांमध्ये सध्या रब्बी हंगामाच्या शेतीकामांची लगबग सुरू आहे. काही ठिकाणी आडसाली सुरू उसाच्या तोडणीला सुरुवात झाली आहे.

एकलहरे : नाशिक तालुका पूर्व भागातील गावांमध्ये सध्या रब्बी हंगामाच्या शेतीकामांची लगबग सुरू आहे. काही ठिकाणी आडसाली सुरू उसाच्या तोडणीला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी गहू, हरभरा या पिकांची पेरणी पूर्ण होऊन त्याची मशागत व उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.  नाशिक तालुका पूर्व भाग व एकलहरे पंचक्रोशीतील सामनगाव, कोटमगाव, चाडेगाव, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरे गाव, गंगावाडी या भागातील शेतकरी रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीत व्यस्त आहेत. सध्या सर्वत्र जोरदार थंडी पडली असूून, या थंडीचा फायदा रब्बी पिकांना होतो. कडाक्याच्या थंडीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, कांदे ही पिके जोमाने वाढतात व त्यांना पाणीही कमी लागते. त्यामुळे या रब्बी पिकांसाठी थंडी वरदान ठरते. मात्र द्राक्षबागांसाठी हीच थंडी मारक ठरते. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षमण्यांच्या वाढीवर परिणाम होतो. तर ज्या मण्यांची वाढ यापूर्वीच झाली आहे त्यांना थंडीमुळे तडे जातात. म्हणून द्राक्षबागांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी चहुबाजूने ग्रीन नेट व वरून जाळीदार नेटचे आवरण लावले जात आहे.गहू,  हरभरा लागवड जोमातरब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गहू, हरभºयाची लागवड तालुक्याच्या पूर्व भागात केली जाते. येथील जमीन काळी कसदार व बारमाही पाण्याखाली असल्याने गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. काही ठिकाणी नोव्हेंबरच्या मध्यात गव्हाची पेरणी झाली आहे. तर काही ठिकाणी अजूनही शेतकरी गव्हाची पेरणी करीत आहेत. क्वचित ठिकाणी टोचन पद्धतीने हरभºयाची लागवड केलेली आहे.नाशिकचा ऊस नगरकडेनाशिक तालुक्यातील पूर्व भागात गोदावरी व दारणा नद्यांच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात ऊसलागवड करण्यात आली असून, आडसाली व सुरू ऊस तोडण्यासाठी ऊसतोड कामगारांचे जत्थे ठिकठिकाणी शेतांमध्ये कुडाच्या व उसाच्या पाचटाच्या झोपड्या करून मुक्कामाला थांबले आहेत. दिवसभर ऊसतोड करून, तो ट्रकमध्ये भरण्याचे काम मजुरांमार्फत केले जाते. नाशिक परिसरातील साखर कारखाने बंद असल्याने सध्या आपला ऊस नगर जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये पाठविला जात आहे. कारखान्यांचे गळीत सुरू होऊन परिसरात बºयापैकी ऊसतोड झाल्याने शेतात उरलेले पाचट तेथेच जाळण्यावर शेतकरी भर देत असून, पाचट जाळल्याने त्याची राख खोडव्याला खत म्हणून वापर केला जातो. पाणी भरल्यावर खोडवा पुन्हा जोमाने फुटतो, अशी शेतकºयांची धारणा आहे.उन्हाळ कांद्याची तयारीएकलहरे परिसरात उन्हाळ कांद्याच्या लागवडीची तयारी केली जात असून, त्यासाठी शेतकरी स्वत: रोपे तयार करीत आहे तर काही रोपे विकत आणून कांद्याची लागवड करतात. कांदा लागवडीसाठी मजुरांची वानवा असल्याने ठेकेदारी पद्धतीने मजूर उपलब्ध करून कांदा लागवड केली जाते.  यंदा कांदा लागवडीसाठी मजुरांची वानवा जाणवण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिकagricultureशेती