शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

कोरोनाकाळात बंद गाड्या सुरू करणार : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 01:36 IST

मागील दोन वर्षांतील कोरोनाच्या काळात बंद झालेल्या सर्व रेल्वेगाड्या सुरू करणार असून, राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणेच रेल्वे सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देनागरिकांना वीज पुरविणे ही राज्य शासनाची जबाबदारी

नाशिक : मागील दोन वर्षांतील कोरोनाच्या काळात बंद झालेल्या सर्व रेल्वेगाड्या सुरू करणार असून, राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणेच रेल्वे सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना दिली. आपल्या खासगी कामानिमित्त काही वेळ नाशिक येथे थांबलेले रावसाहेब दानवे यांनी येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. कोळशाबाबत राज्य वीज वितरण कंपनीने ज्यावेळी नियोजन करायला हवे होते त्यावेळी केले नाही. त्यामुळे राज्यात विजेचे संकट जाणवत आहे. केंद्र शासनाकडे यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त कोळसा आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. राज्यातील नागरिकांना वीज पुरविण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून, केंद्राची जबाबदारी फक्त कोळसा पुरविण्याची असल्याचे त्यांनी राज्यातील वीज संकटाविषयी बोलताना सांगितले. बॉम्बस्फोटाच्या काळात स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दाउदच्या विरोधात सर्वसामान्य जनतेची बाजू घेतली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाउदशी संबंध असणाऱ्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोपही त्यांनी नवाब मलिक प्रकरणावर बोलताना केला.

चौकट-

युक्रेनमधील भारतीयांची चिंता

युक्रेन अडकलेल्या भारतीयांची केंद्र शासनाला चिंता असून तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. केंद्रातील चार मंत्री युक्रेन आणि रशियाच्या आजुबाजूच्या देशांमध्ये जाऊन भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, केंद्र शासन त्यांना मायदेशी आणेल, असा विश्वासही दानवे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेraosaheb danveरावसाहेब दानवे