शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

कोरोनाकाळात बंद गाड्या सुरू करणार : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 01:36 IST

मागील दोन वर्षांतील कोरोनाच्या काळात बंद झालेल्या सर्व रेल्वेगाड्या सुरू करणार असून, राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणेच रेल्वे सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देनागरिकांना वीज पुरविणे ही राज्य शासनाची जबाबदारी

नाशिक : मागील दोन वर्षांतील कोरोनाच्या काळात बंद झालेल्या सर्व रेल्वेगाड्या सुरू करणार असून, राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणेच रेल्वे सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना दिली. आपल्या खासगी कामानिमित्त काही वेळ नाशिक येथे थांबलेले रावसाहेब दानवे यांनी येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. कोळशाबाबत राज्य वीज वितरण कंपनीने ज्यावेळी नियोजन करायला हवे होते त्यावेळी केले नाही. त्यामुळे राज्यात विजेचे संकट जाणवत आहे. केंद्र शासनाकडे यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त कोळसा आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. राज्यातील नागरिकांना वीज पुरविण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून, केंद्राची जबाबदारी फक्त कोळसा पुरविण्याची असल्याचे त्यांनी राज्यातील वीज संकटाविषयी बोलताना सांगितले. बॉम्बस्फोटाच्या काळात स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दाउदच्या विरोधात सर्वसामान्य जनतेची बाजू घेतली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाउदशी संबंध असणाऱ्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोपही त्यांनी नवाब मलिक प्रकरणावर बोलताना केला.

चौकट-

युक्रेनमधील भारतीयांची चिंता

युक्रेन अडकलेल्या भारतीयांची केंद्र शासनाला चिंता असून तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. केंद्रातील चार मंत्री युक्रेन आणि रशियाच्या आजुबाजूच्या देशांमध्ये जाऊन भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, केंद्र शासन त्यांना मायदेशी आणेल, असा विश्वासही दानवे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेraosaheb danveरावसाहेब दानवे