शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

बारावी परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:33 IST

बारावीची परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेच्या दिवसार्पयत शिष्यवृत्तीचे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी रांगा लाऊन उभे राहण्याची वेळ आली. त्यामुळे एकीकडे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त राण्याचे सल्ले दिले जात असताना शासनाकडून विद्यार्थ्यांवर तणावपूर्ण स्थिती लादली जात असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देशिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगाबारावी परीक्षेच्या तोंडावर सादर करण्याचा तणाव ऑनलाईन प्रक्रियेनंतर ऑफलाईनचा घाट

नाशिक : समाज कल्याण विभागाने शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरून घेतल्यानंतर परीक्षेच्या तोंडावर पुन्हा ऑफलाईन अर्ज भरून घेण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेच्या दिवसार्पयत शिष्यवृत्तीचे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी रांगा लाऊन उभे राहण्याची वेळ आली. त्यामुळे एकीकडे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त राण्याचे सल्ले दिले जात असताना शासनाकडून विद्यार्थ्यांवर तणावपूर्ण स्थिती लादली जात असल्याचे समोर आले आहे.समाजकल्याण विभागाकडून 2017-18 शैक्षणिक वर्षासाठी जुलै ते नोव्हेंबर दरम्यान विविध विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन भरून घेण्यात आले आहेत. परंतु, मागील नऊ ते दहा दिवसांपासून समाजकल्याण विभागाने महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून पुन्हा ऑफलाइन अर्ज भरून घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करीत कायमस्वरूपी मार्ग शोधण्याची मागणी केली आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना विविध समस्या उद्भवत होत्या. त्यावर उपाय म्हणून आणि विद्यार्थ्यांना सर्वच प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकाच ठिकाणी अर्ज करता यावेत, शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, अधिकाधिक विद्यार्थ्यांना शासनाच्या शैक्षणिक योजनांचा लाभ घ्याता यावा या हेतूने सरकारने मागील वषापासून महाडीबीटी हे नवीन संकेतस्थळ सुरू केले होते. परंतु, या संकेतस्थळाचाही विद्यार्थ्यांना लाभ होण्याऐवजी मनस्तापच अधिक सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी सर्व्हर डाऊन, आधारकार्ड लिंक करणे, विविध कागदपत्रे दिलेल्या मर्यादेत अपलोड करणे यांसारख्या विविध तांत्रिक समस्या, अडचणींचा सामाना करीत जूलै ते नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु, विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी पुन्हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून अर्जासह कागदपत्रेही जमा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे बुधवारपासून परीक्षा सुरू होणार असतानाही बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयांमध्ये रांगा लावल्या आहेत.

टॅग्स :examपरीक्षाNashikनाशिकStudentविद्यार्थी