शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रमजान पर्व : जुने नाशिक, वडाळा परिसरातील वाहतूक मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:07 IST

मंगळवारी दि.७) रमजान पर्वचा पहिला उपवास (रोजा) असून येत्या ६जूनपर्यंत रमजान पर्व सुरू राहणार आहे. यामुळे जुने नाशिकमधील दुधबाजार, चौकमंडई परिसरात होणारी गर्दीमुळे या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवडाळागावातील रस्ताही बंद६जूनपर्यंत रमजान पर्व सुरू राहणार आहे

नाशिक : मुस्लीम बांधवांचा उपवासांचा पवित्र महिना रमजान पर्वला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त जुने नाशिक, वडाळागाव परिसरातील काही भागांत रस्त्यांवर ‘मिनी मार्केट’ तात्पुरत्या स्वरूपात ठराविक वेळेत थाटले जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवण्याची शक्यता लक्षात घेत वाहतूक मार्गात सायंकाळच्या सुमारास बदल करण्यात आल्याची अधिसूचना उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी जारी केली आहे.मंगळवारी दि.७) रमजान पर्वचा पहिला उपवास (रोजा) असून येत्या ६जूनपर्यंत रमजान पर्व सुरू राहणार आहे. यामुळे जुने नाशिकमधील दुधबाजार, चौकमंडई परिसरात होणारी गर्दीमुळे या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. महिनाभरासाठी दुपारी ४:३० ते सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत शहीद अब्दुल हमीद चौक (दूधबाजार) ते महात्माफुले मंडईजवळील मौलाबाबा दर्गा येथून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूकीसाठी प्रवेश बंद राहणार आहे. भद्रकाली भाजी बाजार, मेनरोड, दहीपूलकडून सारडासर्कलकडे जाणारे वाहनचालक भद्रकाली टॅक्सी स्टॅण्ड येथून पिंपळचौक मार्गे पुढे गंजमाळवरून जातील तसेच त्र्यंबक पोलीस चौकी व गाडगेमहाराज पुतळा येथून वाहने भद्रकाली, दहीपूल परिसरात जातील तसेच फाळकेरोडवरून मौलाबाबा दर्गामार्गे भद्रकालीकडे जाणारी वाहतुक सारडासर्कलवरून गंजमाळ, खडकाळी सिग्नल शालिमारमार्गे पुढे रवाना होतील, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच महात्मा फुले पोलीस चौकी, बागवानपुरामार्गे चौक मंडईमार्गे पिरमोहना कब्रस्तानसमोरून जाणाºया वाहनांना वर नमुद केलेल्या वेळेत प्रवेश बंद करण्यात आला आहे. चौक मंडईकडे जाणारी वाहतुक ही द्वारका सर्कल व टाळकुटेश्वर पुलावरून पुढे जाईल. वाहतूक मार्गातील बदल आपत्कालीन स्थितीत सेवा बजावणारे अग्निशमन दल, रूग्णवाहिका, पोलीस वाहने, वैकुंठरथ यांच्यासाठी शिथिल राहतील असे पोलिसांनी अधिसूचनेत म्हटले आहे. वरील अधिसूचनेचे पालन न करणा-या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.वडाळागावातील रस्ताही बंदरमजान पर्व काळात सायंकाळी ५ वाजेपासून रात्री ८वाजेपर्यंत गौसिया मशिद ते खंडेराव चौकापर्यंतचा मुख्य रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. वरील निर्बंध महिनाभरासाठी लागू राहणार आहे. या मार्गावरही बाजार भरत असल्याने वाहतूक कोंडी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी वाहतूक बदल करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. यामुळे वाहतूक बदलाची नोंद घेऊन पालन करावे असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtraffic policeवाहतूक पोलीसRamzanरमजान