शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

रामतीर्थावर आज अखेरची शाही पर्वणी

By admin | Updated: September 17, 2015 23:54 IST

रामतीर्थावर आज अखेरची शाही पर्वणी

नाशिक : सप्तर्षींचे स्मरण करत भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर रामघाटावरील गोदावरीत साधू-महंतांसह लाखो भाविक शुक्रवारी (दि. १८) डुबकी घेतील आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातील नाशिकमधील तीनही शाही पर्वणींचा अध्याय सुफळ संपूर्ण होईल. नाशिकमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या शाही पर्वणीलाही भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासन कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज झाले असून, महापर्वणीप्रमाणेच बंदोबस्ताचे नियोजन ‘जैसे-थे’ राहणार आहे. दरम्यान, गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेल्या आखाडे व खालशांतील साधू-महंतांनाही आता परतीचे वेध लागले असून, अनेकांनी सामानाची बांधाबांध करून ठेवण्यास सुरुवात केली आहे.नाशिक व त्र्यंबकेश्वर याठिकाणी पहिली पर्वणी दि. २९ आॅगस्टला, तर द्वितीय महापर्वणी १३ सप्टेंबरला निर्विघ्न पार पडली. आता नाशिक येथे वैष्णव पंथीयांची अखेरची व तिसरी पर्वणी शुक्रवारी (दि. १८) होत असून, त्र्यंबकेश्वर येथील शैव पंथीयांची अखेरची पर्वणी आठवडाभरानंतर दि. २५ सप्टेंबरला पार पडणार आहे. ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर नाशिक येथे तृतीय शाहीस्नान होणार असल्याने याही पर्वणीला भाविकांची विशेषत: महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या पर्वणीलाही तपोवनातील साधुग्राममधून लक्ष्मीनारायण मंदिरापासून तीनही प्रमुख आखाडे व खालशांची ब्रह्म मुहूर्तावर शाही मिरवणूक निघेल. या मिरवणुकीत द्वितीय पर्वणीप्रमाणेच आखाड्यांचा क्रम राहणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी निर्मोही आखाडा राहणार असून, मधोमध नेहमीप्रमाणे दिगंबर आखाडा चालणार आहे. सर्वांत शेवटी निर्वाणी आखाडा रामकुंडाकडे प्रस्थान करेल. अखेरच्या पर्वणीला मात्र हे तीनही आखाडे परतीच्या मार्गाला लागण्यापूर्वी रामघाट परिसरात एकाच ठिकाणी थांबणार आहेत. शेवटी येणाऱ्या निर्वाणी आखाड्याचे शाहीस्नान आटोपल्यानंतर अगोदर निर्वाणी आखाडा परतीच्या मार्गाला लागेल. त्यापाठोपाठ दिगंबर आणि निर्मोही आखाडा साधुग्रामकडे प्रयाण करेल. प्रमुख तीनही आखाडे व खालशांचे शाहीस्नान सकाळी १० वाजेपर्यंत आटोपण्याची शक्यता असून, त्यानंतर भाविकांना रामकुंड खुले करून दिले जाणार आहे. विघ्नहर्त्या गणरायाचे घरोघरी झालेले आगमन आणि पहिल्या दोन्ही पर्वणीलाच लक्षावधी भाविकांनी लावलेली हजेरी यामुळे तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीला भाविकांची संख्या घटण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदोबस्ताची पूर्ण तयारी केली आहे. दुसऱ्या पर्वणीचेच बंदोबस्ताचे नियोजन तिसऱ्या पर्वणीला कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, भाविकांच्या गर्दीचा अंदाज व परिस्थिती पाहून बंदोबस्त शिथील केला जाणार आहे. शुक्रवारी एकाचवेळी त्र्यंबकेश्वर याठिकाणी पर्वणी नसल्याने पोलीस व जिल्हा प्रशासनाचा ताण बराच हलका झाला आहे. रिते होऊ लागले साधुग्राम१४ जुलैला सिंहस्थ कुंभमेळ्याची धर्मध्वजा फडकल्यानंतर तपोवनातील सुमारे ३३५ एकर जागेत साधुग्राममध्ये प्रमुख तीन आखाड्यांसह त्यांच्या आठशेहून अधिक खालशांचा मुक्काम आहे. शुक्रवारी शेवटची शाहीपर्वणी असल्याने साधुग्राम परिसरात साधू-महंतांनाही आता परतीचे वेध लागले आहेत. अनेक खालसे व धार्मिक संस्थांनी, तर तिसऱ्या पर्वणीपूर्वीच साधुग्राम खाली केले आहे. साधुग्राममधील भाविकांचीही वर्दळ आता बऱ्यापैकी कमी झाली असून, अखेरची पर्वणी आटोपल्यानंतर साधुग्राम रिते व्हायला सुरुवात होईल.