शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

रामतीर्थावर आज अखेरची शाही पर्वणी

By admin | Updated: September 17, 2015 23:54 IST

रामतीर्थावर आज अखेरची शाही पर्वणी

नाशिक : सप्तर्षींचे स्मरण करत भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर रामघाटावरील गोदावरीत साधू-महंतांसह लाखो भाविक शुक्रवारी (दि. १८) डुबकी घेतील आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातील नाशिकमधील तीनही शाही पर्वणींचा अध्याय सुफळ संपूर्ण होईल. नाशिकमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या शाही पर्वणीलाही भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासन कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज झाले असून, महापर्वणीप्रमाणेच बंदोबस्ताचे नियोजन ‘जैसे-थे’ राहणार आहे. दरम्यान, गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेल्या आखाडे व खालशांतील साधू-महंतांनाही आता परतीचे वेध लागले असून, अनेकांनी सामानाची बांधाबांध करून ठेवण्यास सुरुवात केली आहे.नाशिक व त्र्यंबकेश्वर याठिकाणी पहिली पर्वणी दि. २९ आॅगस्टला, तर द्वितीय महापर्वणी १३ सप्टेंबरला निर्विघ्न पार पडली. आता नाशिक येथे वैष्णव पंथीयांची अखेरची व तिसरी पर्वणी शुक्रवारी (दि. १८) होत असून, त्र्यंबकेश्वर येथील शैव पंथीयांची अखेरची पर्वणी आठवडाभरानंतर दि. २५ सप्टेंबरला पार पडणार आहे. ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर नाशिक येथे तृतीय शाहीस्नान होणार असल्याने याही पर्वणीला भाविकांची विशेषत: महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या पर्वणीलाही तपोवनातील साधुग्राममधून लक्ष्मीनारायण मंदिरापासून तीनही प्रमुख आखाडे व खालशांची ब्रह्म मुहूर्तावर शाही मिरवणूक निघेल. या मिरवणुकीत द्वितीय पर्वणीप्रमाणेच आखाड्यांचा क्रम राहणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी निर्मोही आखाडा राहणार असून, मधोमध नेहमीप्रमाणे दिगंबर आखाडा चालणार आहे. सर्वांत शेवटी निर्वाणी आखाडा रामकुंडाकडे प्रस्थान करेल. अखेरच्या पर्वणीला मात्र हे तीनही आखाडे परतीच्या मार्गाला लागण्यापूर्वी रामघाट परिसरात एकाच ठिकाणी थांबणार आहेत. शेवटी येणाऱ्या निर्वाणी आखाड्याचे शाहीस्नान आटोपल्यानंतर अगोदर निर्वाणी आखाडा परतीच्या मार्गाला लागेल. त्यापाठोपाठ दिगंबर आणि निर्मोही आखाडा साधुग्रामकडे प्रयाण करेल. प्रमुख तीनही आखाडे व खालशांचे शाहीस्नान सकाळी १० वाजेपर्यंत आटोपण्याची शक्यता असून, त्यानंतर भाविकांना रामकुंड खुले करून दिले जाणार आहे. विघ्नहर्त्या गणरायाचे घरोघरी झालेले आगमन आणि पहिल्या दोन्ही पर्वणीलाच लक्षावधी भाविकांनी लावलेली हजेरी यामुळे तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीला भाविकांची संख्या घटण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदोबस्ताची पूर्ण तयारी केली आहे. दुसऱ्या पर्वणीचेच बंदोबस्ताचे नियोजन तिसऱ्या पर्वणीला कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, भाविकांच्या गर्दीचा अंदाज व परिस्थिती पाहून बंदोबस्त शिथील केला जाणार आहे. शुक्रवारी एकाचवेळी त्र्यंबकेश्वर याठिकाणी पर्वणी नसल्याने पोलीस व जिल्हा प्रशासनाचा ताण बराच हलका झाला आहे. रिते होऊ लागले साधुग्राम१४ जुलैला सिंहस्थ कुंभमेळ्याची धर्मध्वजा फडकल्यानंतर तपोवनातील सुमारे ३३५ एकर जागेत साधुग्राममध्ये प्रमुख तीन आखाड्यांसह त्यांच्या आठशेहून अधिक खालशांचा मुक्काम आहे. शुक्रवारी शेवटची शाहीपर्वणी असल्याने साधुग्राम परिसरात साधू-महंतांनाही आता परतीचे वेध लागले आहेत. अनेक खालसे व धार्मिक संस्थांनी, तर तिसऱ्या पर्वणीपूर्वीच साधुग्राम खाली केले आहे. साधुग्राममधील भाविकांचीही वर्दळ आता बऱ्यापैकी कमी झाली असून, अखेरची पर्वणी आटोपल्यानंतर साधुग्राम रिते व्हायला सुरुवात होईल.