शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

डुबेरेत रोहयोवरील मजुरांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 01:11 IST

जीवन विमा व बचत आजच्या जीवनातील अनिवार्य व आवश्यक बाब झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिन्नर टपाल कार्यालयाने डुबेरे येथील रोजगार हमी योजनेवरील मजुरांसाठी खास विमा मेळाव्याचे आयोजन केले होते.

सिन्नर : जीवन विमा व बचत आजच्या जीवनातील अनिवार्य व आवश्यक बाब झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिन्नर टपाल कार्यालयाने डुबेरे येथील रोजगार हमी योजनेवरील मजुरांसाठी खास विमा मेळाव्याचे आयोजन केले होते.तालुका पोस्टमास्तर आर. व्ही. परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली व विमा क्षेत्रीय अधिकारी अमोल गवांदे यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. यामध्ये सर्व मजुरांना ग्रामीण टपाल जीवन विमा, तसेच सुरक्षा विमा योजना यासंबंधी माहिती देण्यात आली व सर्व मजुरांचा विमा उतरविण्यात आला.भारतीय टपाल खात्याची विमा पॉलिसी सर्वांत जुनी मानली जाते. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरू झालेली ही योजना २४ मार्च १९९५ पासून ग्रामीण जनतेसाठी खुली करण्यात आल्याची माहिती विमा क्षेत्रीय अधिकारी अमोल गवांदे यांनी दिली. इतर विमा कंपन्यांपेक्षा कमी हप्ता व अधिक बोनस यामुळे ग्रामीण भागातील लोक डाक विभागाच्या पॉलिसीला अधिक पसंती देत असल्याचे गवांदे यांनी सांगितले. यामध्ये संपूर्ण जीवन विमा, मुदतीचा विमा (ग्राम संतोष), परिवर्तनीय संपूर्ण विमा (ग्राम सुविधा), प्रत्याशित मुदतीचा विमा (ग्राम सुमंगल), मुलांचा विमा या योजनांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. यात मुदतीच्या विम्यास सर्वांनीच पसंती दिली असून, विशेष म्हणजे यामधील गुंतवणूक प्राप्तिकर सवलतीस लागू असल्याचे ते म्हणाले. या योजनेमध्ये ग्रामीण जनतेने सहभागी होण्याचे आवाहन परदेशी व गवांदे यांनी यावेळी केले.बाळासाहेब दराडे यांनी सूत्रसंचालन केले. बाळू गोफणे यांनी आभार मानले. समाधान एखंडे, मनोज नांदूरकर, गणेश जगताप, मिलिंद सोनवणे, प्रशांत लोळगे, एकनाथ बेदाडे यांनी मेळावा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारी