शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

डुबेरेत रोहयोवरील मजुरांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 01:11 IST

जीवन विमा व बचत आजच्या जीवनातील अनिवार्य व आवश्यक बाब झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिन्नर टपाल कार्यालयाने डुबेरे येथील रोजगार हमी योजनेवरील मजुरांसाठी खास विमा मेळाव्याचे आयोजन केले होते.

सिन्नर : जीवन विमा व बचत आजच्या जीवनातील अनिवार्य व आवश्यक बाब झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिन्नर टपाल कार्यालयाने डुबेरे येथील रोजगार हमी योजनेवरील मजुरांसाठी खास विमा मेळाव्याचे आयोजन केले होते.तालुका पोस्टमास्तर आर. व्ही. परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली व विमा क्षेत्रीय अधिकारी अमोल गवांदे यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. यामध्ये सर्व मजुरांना ग्रामीण टपाल जीवन विमा, तसेच सुरक्षा विमा योजना यासंबंधी माहिती देण्यात आली व सर्व मजुरांचा विमा उतरविण्यात आला.भारतीय टपाल खात्याची विमा पॉलिसी सर्वांत जुनी मानली जाते. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरू झालेली ही योजना २४ मार्च १९९५ पासून ग्रामीण जनतेसाठी खुली करण्यात आल्याची माहिती विमा क्षेत्रीय अधिकारी अमोल गवांदे यांनी दिली. इतर विमा कंपन्यांपेक्षा कमी हप्ता व अधिक बोनस यामुळे ग्रामीण भागातील लोक डाक विभागाच्या पॉलिसीला अधिक पसंती देत असल्याचे गवांदे यांनी सांगितले. यामध्ये संपूर्ण जीवन विमा, मुदतीचा विमा (ग्राम संतोष), परिवर्तनीय संपूर्ण विमा (ग्राम सुविधा), प्रत्याशित मुदतीचा विमा (ग्राम सुमंगल), मुलांचा विमा या योजनांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. यात मुदतीच्या विम्यास सर्वांनीच पसंती दिली असून, विशेष म्हणजे यामधील गुंतवणूक प्राप्तिकर सवलतीस लागू असल्याचे ते म्हणाले. या योजनेमध्ये ग्रामीण जनतेने सहभागी होण्याचे आवाहन परदेशी व गवांदे यांनी यावेळी केले.बाळासाहेब दराडे यांनी सूत्रसंचालन केले. बाळू गोफणे यांनी आभार मानले. समाधान एखंडे, मनोज नांदूरकर, गणेश जगताप, मिलिंद सोनवणे, प्रशांत लोळगे, एकनाथ बेदाडे यांनी मेळावा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारी