शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

राजापूरला दुष्काळाने उभा कांदा करपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 6:01 PM

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूरच्या भाळी दोन वर्षाआड दुष्काळ लिहिलेला आहे. यंदा या दुष्काळाने तर सीमा ओलडल्या असून, पैसे, पाणी व अन्नधान्य अशा सर्व पातळीवर दुष्काळ छळू लागला आहे. मका, कपाशी, कांदे निघून गेल्याने शेती ओस पडली आहे.

ठळक मुद्दे येथील शेती पावसाच्या भरवशावर असताना शेतकऱ्यांनी पहिल्या हलक्या पावसावरच कपाशी पाठोपाठ मकाची लागवड केली. पण ऐन पीकवाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने जोमाने तीन-साडेतीन फुटापर्यत उंच वाढणारी कपाशी दीड-दोन फुटावरच अडकली, तर मकाचा शेंडा सहा फुटांवर न पोहोचता

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूरच्या भाळी दोन वर्षाआड दुष्काळ लिहिलेला आहे. यंदा या दुष्काळाने तर सीमा ओलडल्या असून, पैसे, पाणी व अन्नधान्य अशा सर्व पातळीवर दुष्काळ छळू लागला आहे. मका, कपाशी, कांदे निघून गेल्याने शेती ओस पडली आहे.   झाडाची भर न झाल्याने कापसाला दरवर्षी ५० ते ९० पर्यंत बोंडे लागून एकरी ८ ते १२ क्विंटल उत्पन्न निघते तेथे यावर्षी १० ते २० बोंडे येऊन १ ते ३ क्विंटल उत्पन्न निघाले आहे. मकाचे एकरी २५ ते ३२ क्विंटलपर्यंत दरवर्षी उत्पन्न हाती लागते. यावर्षी उत्पन्न ३ ते ५ क्विंटलपर्यंत घटून फक्त चाराच हाती आला आहे. पुढे पाऊस पडेल या भरवशावर लाल कांद्याच्या लागवडीचा जुगार खेळत पुन्हा एकदा नशीब आजमवण्याच्या प्रयत्न पाणीच नसल्याने फसला अन् उभा कांदा करपला.आज हजार एकरांवर जमीन पिकांअभावी ओसाड पडली असून, जिकडे पाहावे तिकडे मोकळे रानमाळ दिसत आहे. अनेकांनी बैल, ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करून ठेवल्याने ढेकळांशिवाय काहीही नजरेत पडत नाही. परिसरातील गाव व वाड्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तेव्हा रब्बी हंगामाचा विषयच नाही.आता फक्त जून उजाडावा आणि धोधो पाऊस पडावा हीच आस नव्या हंगामासाठी राजापूरकरांना लागून आहे.-बंधारे कोरडे, तर ७० टक्के विहिरी पावसाळ्यातही कोरड्या होत्या.-पावसाळ्यात फक्त दोन सर्वसाधारण, तर सुमारे १८-२०टक्के रब्बी पेरणी बोटावर मोजण्या इतकीच झाली.-अनेक शेततळे वर्षभर रिकामे होते, तर आता ९७ टक्के तळे कोरडेठाक पडले आहेत.उन्हाच्या तीव्रतेने शेततळ्यांचे कागद खराब होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राजापूर हे येवला तालुक्याच्या पूर्वेकडील उंचावर असल्याने येथे दरवर्षी पाऊस पडूनही उत्पन्न निघते असे नाही. राजापूरकरांच्या नशिबी दुष्काळ हा दरवर्षी पाचवीलाच पूजलेला आहे. हरणे, मोर व अन्य वन्यजीव अन्न-पाण्याच्या शोधात गावाकडे येत आहे. दुष्काळसदृश स्थितीचा सामना पशुपक्ष्यांनाही करावा लागत आहे. डिसेंबरमध्येच अशी स्थिती असून,पुढील सहा ते सात महिने कसे काढावे या विचाराने शेतकरी चिंतित आहे.==राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने निसर्गाच्या भरवशावर येथील शेतकरी शेती करतात. हे गाव उंचावर असल्याने येथे कुठल्याही सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे शेतकरी व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे-काशीनाथ चव्हाण, शेतकरी, राजापूर