शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
2
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
3
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
4
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
5
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
6
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
7
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
8
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
9
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
10
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
11
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
12
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
13
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
14
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
15
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
16
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
17
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
18
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
19
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
20
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
Daily Top 2Weekly Top 5

राजाभाऊ वाजे : आढावा बैठकीत लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन

By admin | Updated: February 12, 2016 22:53 IST

३१ बंधाऱ्यांतील गाळ काढणार

 सिन्नर : लघु पाटबंधारे विभाग तालुक्यातील ३१ गावांमधील बंधाऱ्यांतील गाळ काढणार असून, त्यासाठी मशिनरी उपलब्ध झाल्या आहेत. लोकसहभाग वाढवून बंधाऱ्यातील गाळ उपसून पाणीसाठा वाढवून घेण्याचे आवाहन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले.येथील पंचायत समितीच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियानातून पाटबंधारे विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार वाजे यांच्या अध्यक्षतेखाली ३१ गावांतील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांची बैठक बोलविण्यात आली होती. व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, प्रकाश कदम, उदय सांगळे, वसंत उघडे, अलका पवार, सोनाली कर्डक, सहायक गटविकास अधिकारी मधुकर वाघ, उपअभियंता एस. व्ही. बोरोले, विजय काटे, विजय इंगळे, टी.जे. राजवाडे, एन. पी. देशमुख आदि उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानातून बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी शासनाने जेसीबी व डिझेल उपलब्ध करून दिले असल्याची माहिती उपअभियंता विजय इंगळे यांनी दिली. तथापि, गुरुवारी मशीन उपलब्ध झाल्यानंतर गाळ वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध न झाल्याने लोकसहभाग वाढविण्यासाठी आमदार वाजे यांनी तातडीने बैठकीचे आयोजन केले होते. मशीन व डिझेल उपलब्ध झाले असून, जलयुक्त शिवार अभियानात सहभाग असलेल्या ३१ गावांनी या संधीचा फायदा करून घेण्याच्े आवाहन वाजे यांनी केले. ज्या गावांची लोकसहभाग देऊन बंधाऱ्यातून काढलेला गाळ उपसण्याची तयारी असेल अशा गावांना मशीन पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पिंपरवाडी येथून गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ होणार असून, त्यानंतर पाथरे बुद्रूक येथे काम केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी वाद न करता ट्रॅक्टर लावून गाळ वाहून न्यावा, मशीन बंद राहणार नाही व वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे वाजे यांनी सांगितले. ज्या गावात काम सुरू झाले ते पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या गावात मशीन पाठविण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेतून कामे करण्यासाठी २५ टक्के लोकसहभाग आवश्यक असून, प्रशासनानेही सहकार्य करावे, असे आवाहन वाजे यांनी केले.बैठकीस उपस्थितीत असलेल्या गावांपैकी सुमारे १६ गावांच्या सरपंचांनी तातडीने लोकसहभाग देऊन ट्रॅक्टरद्वारे गाळ वाहून नेण्यास तयार असल्याचे सांगून मशीन आपल्या गावांना पाठविण्याची विनंती केली. ३१ पैकी काही गावांचे सरपंच बैठकीस अनुपस्थित होते. घोटेवाडी व कासारवाडी येथील पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावात जलयुक्त शिवार योजनेतून बंधाऱ्यातील गाळ काढण्यास असहमती दर्शविली.