शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
3
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
4
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
6
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
7
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
8
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
9
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
10
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
12
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
13
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
14
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
15
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
16
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
17
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
18
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
19
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
20
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ

राजाभाऊ वाजे : आढावा बैठकीत लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन

By admin | Updated: February 12, 2016 22:53 IST

३१ बंधाऱ्यांतील गाळ काढणार

 सिन्नर : लघु पाटबंधारे विभाग तालुक्यातील ३१ गावांमधील बंधाऱ्यांतील गाळ काढणार असून, त्यासाठी मशिनरी उपलब्ध झाल्या आहेत. लोकसहभाग वाढवून बंधाऱ्यातील गाळ उपसून पाणीसाठा वाढवून घेण्याचे आवाहन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले.येथील पंचायत समितीच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियानातून पाटबंधारे विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार वाजे यांच्या अध्यक्षतेखाली ३१ गावांतील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांची बैठक बोलविण्यात आली होती. व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, प्रकाश कदम, उदय सांगळे, वसंत उघडे, अलका पवार, सोनाली कर्डक, सहायक गटविकास अधिकारी मधुकर वाघ, उपअभियंता एस. व्ही. बोरोले, विजय काटे, विजय इंगळे, टी.जे. राजवाडे, एन. पी. देशमुख आदि उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानातून बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी शासनाने जेसीबी व डिझेल उपलब्ध करून दिले असल्याची माहिती उपअभियंता विजय इंगळे यांनी दिली. तथापि, गुरुवारी मशीन उपलब्ध झाल्यानंतर गाळ वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध न झाल्याने लोकसहभाग वाढविण्यासाठी आमदार वाजे यांनी तातडीने बैठकीचे आयोजन केले होते. मशीन व डिझेल उपलब्ध झाले असून, जलयुक्त शिवार अभियानात सहभाग असलेल्या ३१ गावांनी या संधीचा फायदा करून घेण्याच्े आवाहन वाजे यांनी केले. ज्या गावांची लोकसहभाग देऊन बंधाऱ्यातून काढलेला गाळ उपसण्याची तयारी असेल अशा गावांना मशीन पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पिंपरवाडी येथून गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ होणार असून, त्यानंतर पाथरे बुद्रूक येथे काम केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी वाद न करता ट्रॅक्टर लावून गाळ वाहून न्यावा, मशीन बंद राहणार नाही व वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे वाजे यांनी सांगितले. ज्या गावात काम सुरू झाले ते पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या गावात मशीन पाठविण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेतून कामे करण्यासाठी २५ टक्के लोकसहभाग आवश्यक असून, प्रशासनानेही सहकार्य करावे, असे आवाहन वाजे यांनी केले.बैठकीस उपस्थितीत असलेल्या गावांपैकी सुमारे १६ गावांच्या सरपंचांनी तातडीने लोकसहभाग देऊन ट्रॅक्टरद्वारे गाळ वाहून नेण्यास तयार असल्याचे सांगून मशीन आपल्या गावांना पाठविण्याची विनंती केली. ३१ पैकी काही गावांचे सरपंच बैठकीस अनुपस्थित होते. घोटेवाडी व कासारवाडी येथील पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावात जलयुक्त शिवार योजनेतून बंधाऱ्यातील गाळ काढण्यास असहमती दर्शविली.