शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मनसेत नवा-जुना वाद करणाऱ्यांना राज ठाकरे यांची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:17 IST

आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटनेत शाखाध्यक्षांच्या नेमणुका करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर गुरुवारी (दि.२३) येथील हॉटेल ...

आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटनेत शाखाध्यक्षांच्या नेमणुका करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर गुरुवारी (दि.२३) येथील हॉटेल एसएसके येथे झालेल्या शाखाध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या हस्ते नूतन शाखाध्यक्षांना तसेच विभाग अध्यक्षांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. बंद खोलीत झालेल्या कार्यक्रमात राज यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नवे-जुने वादावरून कानपिचक्या देतानाच पक्षशिस्त राखलीच पाहिजे, असे मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर युवा नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, माजी महापौर अशोक मुर्तडक यांंच्यासह दिलीप दातीर, अंकुश पवार, रतनकुमार इचम, अनंता सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

पक्षातील नवा-जुना वाद टाळण्यावर भर देताना घरात लहान मूल आल्यानंतर त्याचे लाड करतो की बाजूला सारतो, असा प्रश्न त्यांनी केला आणि असा वाद टाळण्याचे आवाहन केले. तसे यापुढे पक्षशिस्तीला महत्त्व असेल. ज्यांना पक्षाच्या बैठकीला निमंत्रित केले, त्यांनीच केवळ हजर राहावे, असेही ते म्हणाले.

मनपात मनसेची सत्ता असताना कामे प्रचंड झालीच, मात्र भ्रष्टाचाराचा एक आरोपही मनसेवर झाला नाही, याचे स्मरण करून देत त्यांनी मनसेच्या काळात काय झाले आणि नंतर काय झाले, याची लोकांना जाणीव झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी माजी आमदार बाळा आमदार, अनिल शिदोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

इन्फो...

मनसेचा पक्षध्वज घराघरांवर लावा...

मनसेचे संघटन प्रचंड वाढवा, जागा तेथे शाखा असा उपक्रम राबवा. आपल्या भागात शाखा नाही, याची खंत वाटली पाहिजे. आपल्या परिसरात घरांवर मनसेचे ध्वज लावा, पक्षाचे झेंडे किती लागले, ते तुमचा विस्तार दर्शवतात, अशा अनेक टीप्स राज ठाकरे यांनी दिल्या. आपल्या भागात कोण राहतो, त्याचे नाव माहिती असली पाहिजे. आपुलकीने बाेलवता आले पाहिजे, इतकी माहिती ठेवा, असे सांगतानाच निवडणुकीपुरते उमेदवार खोटेखोटे गाेड बाेलून हात जोडतात, तसे करण्यापेक्षा आपुलकीने वागा, असेही सांगितले.

इन्फो...

घराबाहेर जोडे किती ते महत्त्वाचे...

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आचार्य अत्रे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेकांच्या आठवणी कथन करताना राज ठाकरे यांनी घराबाहेर जोडे किती, यावर तुमचा लोकसंग्रह किंवा संपत्ती किती हे कळते. त्यामुळे लोकांना जोडा, असे त्यांनी सांगितले. मुंबईच्या अंधेरी भागातील जुने नगरसेवक शांताराम आंबोरे यांची आठवण सांगताना ते झाडाखाली भेटून लाेकांना भेटत, त्यामुळे कुठे बसता, ते महत्त्वाचे नाही. लोकांना भेटणे महत्त्वाचे आहे, असे राज यांनी सांगितले.

---

२३ पीएचएसपी ६१