शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांची माफी मागावी : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 01:51 IST

देशाचा कारभार संविधानाने चालतो. त्यामुळे भोंगे काढण्याची, वाजविण्याची भाषा करून समाजासमाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करता कामा नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. राज ठाकरे यांच्या अयोध्येला जाण्यास विरोध नाही; परंतु उत्तरभारतीयांची त्यांनी माफी मागितली पाहिजे. भगवा रंग शांततेचे प्रतीक आहे. अंगावर भगवा घेतल्यावर वाद करता कामा नये, असेही आठवले यावेळी म्हणाले.

ठळक मुद्दे जातीय तेढ निर्माण न करण्याचाही दिला सल्ला

देवळाली कॅम्प : देशाचा कारभार संविधानाने चालतो. त्यामुळे भोंगे काढण्याची, वाजविण्याची भाषा करून समाजासमाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करता कामा नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. राज ठाकरे यांच्या अयोध्येला जाण्यास विरोध नाही; परंतु उत्तरभारतीयांची त्यांनी माफी मागितली पाहिजे. भगवा रंग शांततेचे प्रतीक आहे. अंगावर भगवा घेतल्यावर वाद करता कामा नये, असेही आठवले यावेळी म्हणाले.

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देवळाली कॅम्प येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सभेत आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे होते. यावेळी आठवले यांनी सध्या देशात सुरू असलेल्या भोंगे आणि अयोध्या प्रकरणावरून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यास विरोध नाही; परंतु उत्तरभारतीयांची माफी मागावी, धर्मा धर्मात तेढ निर्माण करू नये कारण भगवा रंग हा गौतम बुद्धांचा आहे. बुद्ध व भगवा रंग शांततेचा आहे. ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालिमीत तयार झालेले असल्याने वाद करण्यापेक्षा वाद मिटविण्याचे काम त्यांनी केले पाहिजे. अंगावर भगवा घेतल्यावर वाद नको, असा सल्लाही त्यांनी दिला.

रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी एकत्र आल्यास पक्षाचे प्रतिनिधित्व दिल्लीसह राज्यात निर्माण होईल. यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारायला आपण तयार आहोत, शिवाय आपला प्रवास पँथर ते रिपब्लिकन पार्टी असा झालेला असून रक्ताच्या शेवटपर्यंत रिपाइंच राहू, असे त्यांनी सांगितले. यावेळी अमोल पगारे, चंद्रकांत भालेराव, सिद्धार्थ पगारे, आर डी जाधव, अशोक साळवे, गौतम भालेराव, संतोष कटारे, पंडित साळवे, सुभाष बोराडे, गौतम पगारे, संजय भालेराव, प्रभाताई धिवरे, विश्वनाथ काळे, नितीन साळवे, राजू वाघमारे, जयंतीभाई गडा, भगवान कटारिया, योगेश लोखंडे, आदी उपस्थित होते.

चौकट...

मशिदींसमोर गळे कशाला काढता?

भोंगे कशाला काढायचे? हनुमान चालिसा जरूर म्हणा; पण मशिदींसमोर जाऊन गळा काढू नका. संविधनातील भारत उभा करायचा आहे. सर्वांना एकत्र आणून सुखशांतीने जीवन जगायचे आहे. वाद कशाला करायचा, असेही आठवले यावेळी म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकRamdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरे