शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज ठाकरे यांच्या आदेशामुळे नाशकात मनसैनिकांची शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 15:49 IST

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावल्यानंतर गुरुवारी (दि.२२) चौकशीदरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राज ठाकरे यांनी शांततेचा संदेश पाठविल्याने कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यात आले नाही. केवळ ‘राजगड’वर शांततेच्या मार्गाने कार्यकर्ते जमले होते.

ठळक मुद्देकोणतेही आंदोलन नाहीपोलीसांनी बजावल्या होत्या नोटिसा

नाशिक :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावल्यानंतर गुरुवारी (दि.२२) चौकशीदरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राज ठाकरे यांनी शांततेचा संदेश पाठविल्याने कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यात आले नाही. केवळ ‘राजगड’वर शांततेच्या मार्गाने कार्यकर्ते जमले होते.

मुंबई-पुण्यानंतर नाशिक शहर हे राज ठाकरेंचा गड मानला गेला होता. राज यांनी मराठीसाठी आंदोलने सुरू केल्यानंतर सर्वाधिक आक्रमकता नाशिकमध्येच दिसली होती. आता काही वर्षांपासून मनसे थंड झाली असून, अनेक नेते नगरसेवक अन्य पक्षात गेले आहेत. त्यानंतरही राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आणि राज यांना गुरुवारी (दि.२२) चर्चेसाठी हजर राहण्यास सांगितले असल्याने शहरात आंदोलने होण्याची शक्यता होती. शहरात अशांतता निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी प्रमुख कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या होत्या. तर राज ठाकरे यांनीदेखील शांततेचे आवाहन केले होते. या सर्वांचा परिपाक म्हणून शहरात आंदोलने झाली नसल्याचे मनसेचे म्हणणे आहे. केवळ काही कार्यकर्ते राजगडावर जमले होते.

दरम्यान, शहरात नागरिकांना त्रास होईल अशा प्रकारची कृती, आंदोलने करू नका, असे आदेशच राज ठाकरे यांनी दिले होते. प्रमुख नेत्यांना त्यांनी फोनदेखील केले होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यात आले नाही, असे मनसेचे शहराध्यक्ष अनिल मटाले यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे