शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

राज म्हणतात, मंत्र्यांना कांदे फेकून मारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 17:47 IST

कांदा उत्पादकांशी संवाद : कळवण, सटाणा भागात दौरा

ठळक मुद्देकांदा लागल्याने जर मंत्री बेशुद्ध पडला तर तोच कांदा फोडा आणि त्याच्या नाकाला लावा, असेही सांगायला राज विसरले नाहीत.

कळवण : कांदे रस्त्यावर फेकू नका. त्यात तुमचेच नुकसान होणार आहे. सरकारला काही फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही सेना-भाजपा युतीच्या मंत्र्यांना कांदे फेकून मारा, असा सल्ला महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कळवण येथे कांदा उत्पादकांशी संवाद साधताना दिला. कांदा लागल्याने जर मंत्री बेशुद्ध पडला तर तोच कांदा फोडा आणि त्याच्या नाकाला लावा, असेही सांगायला राज विसरले नाहीत. दरम्यान, कळवण आणि सटाणा येथे राज यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.दोन दिवसांपासून जिल्हा दौ-यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (दि. १९) कळवण येथील पदाधिकारी, कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी व उद्योजक यांच्यासह बेरोजगार युवा-युवती यांच्याशी संवाद साधला. राज यांचे कळवण शहरात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताश्यांच्या गजरात मनसैनिकांनी स्वागत केले. उद्योगपती बेबीलाल संचेती यांच्या निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर बेबीलाल संचेती यांच्यासह सुनील संचेती, निर्मला संचेती तसेच मनसे तालुकाध्यक्ष शशी पाटील, शहराध्यक्ष डॉ. दीपक शेवाळे, माजी शहराध्यक्ष नितीन पगार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र कोतवाल संघटना, डॉक्टर असोसिएशन यांनी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी मनसे तालुकाप्रमुख शशिकांत पाटील, शहराध्यक्ष डॉ. दीपक शेवाळे, अजय दुबे, उपाध्यक्ष चेतन मैंद, दीपक दुसाने, कृष्णा जगताप, उमेश भास्कर, सुरज पगार, नीलेश शिंदे, केदा गवांदे, संदीप पवार, रोहन निकम, रोशन निकम, अक्षय सोनवणे, उदय सोनवणे, पराग मालपुरे, कुणाल वडखळे, सुशांत मोरे, विनय कोठावदे, अमोल सोनवणे, उदय पिंगळे, आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकRaj Thackerayराज ठाकरे