शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

त्र्यंबकला पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 23:23 IST

त्र्यंबकेश्वर : अवकाळी पावसाने कहर मांडला असून कालपासून अभ्राच्छादित वातावरण असल्याने सूर्याचे दर्शन नाही. थंडीतही वाढ झाली आहे. पावसाचा प्रकोप वाढल्याने शेतात अगर खळ्यात खरीप पिकांची हानी झाली आहे. परिसरात पावसाचा कहर वाढला आहे.

ठळक मुद्देमनमाडला ढगाळ पावसाळी वातावरण

त्र्यंबकेश्वर : अवकाळी पावसाने कहर मांडला असून कालपासून अभ्राच्छादित वातावरण असल्याने सूर्याचे दर्शन नाही. थंडीतही वाढ झाली आहे. पावसाचा प्रकोप वाढल्याने शेतात अगर खळ्यात खरीप पिकांची हानी झाली आहे. परिसरात पावसाचा कहर वाढला आहे. पाऊस ढगफुटी झाल्याप्रमाणे धुंवाधार कोसळत नुकसान करत आहे. वसाने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. अचानक आलेल्या पावसाने ओहळ वाहायला लागले आणि शेतात सोंगून (कापणी केलेले) ठेवलेले भात पाण्यात भिजले आहे. शिवारात सर्वत्र अवकाळीच्या तडाख्यातून पीक वाचविण्याची लगबग दिसून येत आहे.नांदगावी जनजीवन विस्कळीतनांदगांव : बेमोसमी पावसाने दुपारी दोन वाजेनंतर वातावरणात प्रचंड गारठा पसरला असून थंडीने जनजीवन विस्कळीत झाले आहे .दुपारी सुमारे एक तास ढगाळ वातावरणात झिम झिम पाऊस कोसळत होता, कोसळणाऱ्या पावसाचे थेंब अत्यंत गारांसारखे थंड लागत होते.हवेतील गारवा वाढत गेल्याने थंडीचा कडाका वाढत गेला आणि सायंकाळी ६ वाजेनंतर वाढत्या गारठ्यात पुन्हा पावसाचे थेंब कोसळत होते. थंडीमुळे शहरातील व ग्रामीण भागातिल लहान मोठे व्यावसायिक सायंकाळ होताच बंद करुन लवकरच घरी गेले.मनमाडला ढगाळ पावसाळी वातावरणमनमाड : ऐन हिवाळ्यात ढगाळ पावसाळी वातावरण आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून या प्रतिकूल हवामानाचा थेट परिणाम कांदे,भाजीपाला आणि पिकांवर होत असल्याने निसर्गापुढे शेतकरी पुन्हा एकदा हतबल झाले आहेत . मंगळवारी दिवसभर शहरात ढगाळ पावसाळी वातावरण होते . बुधवारी सकाळपासून तर सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत होत्या.या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले . 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी