शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

येवल्यात पिकांना पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:23 IST

येवला : तालुक्यात मका पिकावर लष्करी अळी, तर सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हंगामातील मुख्य पिके संकटात आली आहेत. त्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकेपाण्याखाली गेली तर काही ठिकाणी जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामातील उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

येवला : तालुक्यात मका पिकावर लष्करी अळी, तर सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हंगामातील मुख्य पिके संकटात आली आहेत. त्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकेपाण्याखाली गेली तर काही ठिकाणी जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामातील उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तालुक्यात यावर्षी मान्सूनपूर्व व प्रारंभी चांगला पाऊस झाला. या पावसावर शेतकरी वर्गाने खरीप मका, सोयाबीन, कापूस, मूग, भुईमूग, बाजरी आदी पिके घेतली. तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर मका, सोयाबीन पिके आहेत. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी व सोयाबीन पिकावर उंट अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत आहे.हळूहळू तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र अळींनी बाधित झाल्याने मका, सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांवरील अळींच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी शेतकऱ्यांनी ेकेली. यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.खरिपाची पिके जोमात असताना गेल्या दहा-पंधरा दिवसात पावसाने ओढ दिल्याने पिकांनी माना टाकल्या होत्या. मात्र, गेल्या तीन दिवसांत तालुक्यात सर्वच भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने अंदरसूल परिसरात मका पीक पडले तर पाटोदा, निळखेडे, कातरणी, विखरणी, देशमाने, मानोरी परिसरात पिके पाण्याखाली आली. आधीच अळींच्या आक्रमणाने धोक्यात आलेल्या पिकांना पावसाच्या पाण्याने संजीवनी मिळाली असली तरी काही भागात अतिपावसाने पिके धोक्यात आली आहेत.पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणीतालुक्यात यावर्षी सोयाबीनप्रमाणेच मका पिकाची स्थिती आहे. अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचा पोंगा बाधित झाला आहे. परिणामी यावर्षी तालुक्यात मका, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घटणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने अळीग्रस्त मका, सोयाबीन पिकाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागास द्यावे, नुकसानग्रस्त मका, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक