शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

येवल्यात पिकांना पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:23 IST

येवला : तालुक्यात मका पिकावर लष्करी अळी, तर सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हंगामातील मुख्य पिके संकटात आली आहेत. त्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकेपाण्याखाली गेली तर काही ठिकाणी जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामातील उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

येवला : तालुक्यात मका पिकावर लष्करी अळी, तर सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हंगामातील मुख्य पिके संकटात आली आहेत. त्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकेपाण्याखाली गेली तर काही ठिकाणी जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामातील उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तालुक्यात यावर्षी मान्सूनपूर्व व प्रारंभी चांगला पाऊस झाला. या पावसावर शेतकरी वर्गाने खरीप मका, सोयाबीन, कापूस, मूग, भुईमूग, बाजरी आदी पिके घेतली. तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर मका, सोयाबीन पिके आहेत. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी व सोयाबीन पिकावर उंट अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत आहे.हळूहळू तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र अळींनी बाधित झाल्याने मका, सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांवरील अळींच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी शेतकऱ्यांनी ेकेली. यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.खरिपाची पिके जोमात असताना गेल्या दहा-पंधरा दिवसात पावसाने ओढ दिल्याने पिकांनी माना टाकल्या होत्या. मात्र, गेल्या तीन दिवसांत तालुक्यात सर्वच भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने अंदरसूल परिसरात मका पीक पडले तर पाटोदा, निळखेडे, कातरणी, विखरणी, देशमाने, मानोरी परिसरात पिके पाण्याखाली आली. आधीच अळींच्या आक्रमणाने धोक्यात आलेल्या पिकांना पावसाच्या पाण्याने संजीवनी मिळाली असली तरी काही भागात अतिपावसाने पिके धोक्यात आली आहेत.पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणीतालुक्यात यावर्षी सोयाबीनप्रमाणेच मका पिकाची स्थिती आहे. अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचा पोंगा बाधित झाला आहे. परिणामी यावर्षी तालुक्यात मका, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घटणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने अळीग्रस्त मका, सोयाबीन पिकाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागास द्यावे, नुकसानग्रस्त मका, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक