शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

पावसाने दिंडोरी तालुक्यातील जन जीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 15:17 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाने जोरदार सुरूवात केल्याने शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या आहेत. टमाटा पिकाला हा पाऊस धोका दायक ठरणार असे चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देलखमापूर : टमाटे पिकांना हादरा; शेतकरी वर्ग हतबल

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाने जोरदार सुरूवात केल्याने शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या आहेत. टमाटा पिकाला हा पाऊस धोका दायक ठरणार असे चित्र निर्माण झाले आहे.श्निवारी(दि.१९) पावसाचे आगमन ढगांचा गडगडात व विजांचा कडकडाटाने झाले. अगोदर मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडल्या परंतु रात्री सात नंतर जोरदार पावसाला सुरु वात झाली. त्यात दिंडोरी, लखमापूर, ओझे, करजंवण, अवनखेड, परमोरी, दहेगाव, वागळुद, पिंपरखेड, दहिवी, कोशिंबे, कादवा म्हाळुंगी, ओझरखेड, पोफशी, पुणेगाव तसेच दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्यात जोरदार हजेरी लावली.त्यामुळे शेतकरी वर्गाची मोठी धावपळ झाली. खरीप हंगामातील बरीच नगदी पिकांना परतीच्या पावसाचा धोका निर्माण झाला आहे. त्यात सोयाबीन, मका, मुग, उडीद इ. पिकांची अगोदरच वाट लागल्याने शेतकरी वर्गाने डोक्याला हात लावला असतांना आता पुन्हा एकदा परतीच्या पावसाने थैमान घातल्याने जवळ जवळ खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहे.सध्या दिंडोरी तालुक्यात शेतकरी वर्गाला नगदी भांडवल मिळून देणारे टमाटा पिकांने बऱ्यापैकी बहर घेतला असतांना परतीचा पाऊस या पिकांची पुर्णपणे नुकसान करेल असे चित्र निर्माण झाले आहे . टमाटा पिक वाचविण्यासाठी शेतकरी वर्गाने मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध केले आहे. आता सर्व भर भरून निघेल या आशेवर जगणारा जगाचा पोशिंदा शेतकरी वर्ग पुर्णपणे भुई सपाट होण्याच्या मार्गावर आहे.द्राक्षे पंढरीला परतीच्या पावसाचा विपरीत परिणामदिंडोरी तालुक्यातील द्राक्षे उत्पादक शेतकरी वर्गाला या परतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. सध्या बळीराजांची आॅक्टोबर छाटणीची तयारी चालू आहे. त्यासाठी मजुर, वेगवेगळ्या स्वरूपाची औषधांची खरेदी करून त्याचे पिकांना डोस रूपाने फवारणी केली जाते. परंतु अचानक झालेल्या पावसाने दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे पंढरीतील शेतकरी याने हतबल झालाआहे. द्राक्षे हंगाम कसा घ्यावा ही मोठी समस्या निर्माण झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती